शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र नेमाडे यांणा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

By admin | Updated: April 6, 2015 01:23 IST

भालचंद्र नेमाडे यांणा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

नाशिक : इंग्रजी शाळांना कडाडून विरोध करून मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवे. इंग्रजीचा उदोउदो करणे हा निव्वळ मूर्खपणा असून, इंग्रजीच्या वापरातून आपण कनिष्ठ जातींच्या लोकांवर अत्याचार करीत असतो, असे परखड मत ‘ज्ञानपीठ’ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. संबळच्या तालावर कळवण तालुक्यातील भास्कर व सरस्वती गुंजाळ या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या कार्यक्रमात नेमाडे यांच्यासह सुरेश खानापूरकर, संजय पाटील, विजय हाके, विलास पाटील, स्मिता तांबे, दीप्ती राऊत, सुभाष नंदन, डॉ. दिग्विजय शाह, कृष्णा बच्छाव, अभिमन जाधव, सुनीता पाटील, अविनाश भामरे, प्रतिभा होळकर, कमलाकर देसले यांना ‘गिरणा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी नेमाडे यांनी भाषा, परंपरेतील आधुनिकता, जातिव्यवस्था आदि विषयांवर मुक्त चिंतन केले. जगात सर्वत्र मुलांना मातृभाषेतून शिकवले जात असताना, भारतात मात्र इंग्रजीचा उदोउदो केला जातो. तीन-तीन लाख फी भरून इंटरनॅशनल स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेतले जाते. असे शिक्षण घेणारे लोक हॉटेलांत झाडलोटीचे काम करतात. इंग्रजीमुळे मोठे सामाजिक दोष निर्माण होत आहेत. पुण्यातील शुद्ध मराठीचा आग्रह धरणे चुकीचे असून, बोलीभाषा याच खऱ्या शुद्ध भाषा आहेत, असेही ते म्हणाले. नोबेल, बुकर पुरस्कार मिळवणारे साहित्य खरे नसून, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते हेच खरे चिरंजीव साहित्य आहे. गावातले देशी सौंदर्य अनुभवण्याऐवजी आपण मुंबईत मोठेपण शोधतो, हे चुकीचे आहे. खांदेशी मराठी ही जुन्यात जुनी भाषा असून, ज्ञानेश्वरांपूर्वीही मराठी लिहिली जात असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत विदारक असून, त्यांच्यासाठी चळवळ सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारार्थींच्या वतीने स्मिता तांबे, कमलाकर देसले यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रतिभा नेमाडे, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, आनंद अ‍ॅग्रो समूहाचे अध्यक्ष उद्धव अहिरे, वैशाली अहिरे यांच्यासह पुरस्कारार्थी व्यासपीठावर उपस्थित होते. दीपक करंजीकर यांनी नेमाडे यांचा परिचय करून दिला. दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)