शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर वाद घालणारे, स्वत:हून लिफ्ट देणाऱ्यांपासून सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:16 IST

नाशिक : प्रवास करीत असताना रस्त्यावर विनाकारण वाद घालणाऱ्यांकडून, स्वत:हून लिफ्ट देणारांकडून अथवा पत्ता विचारणारांकडून लुटमारीच्या घटना घडत असल्याचे ...

नाशिक : प्रवास करीत असताना रस्त्यावर विनाकारण वाद घालणाऱ्यांकडून, स्वत:हून लिफ्ट देणारांकडून अथवा पत्ता विचारणारांकडून लुटमारीच्या घटना घडत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून समोर येऊ लागले आहेत. नागरिकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वळवून त्यांच्याकडील पैसे, दागिने अथवा मौल्यवान वस्तूंच्या चोरीसाठी चोरट्यांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जात असून यात अनेकदा महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून पळ काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांकडून प्रवाशांचे लक्ष विचलित करण्यासाठी अनेकदा रस्त्यावर वाद घातला जातो. गाडीचा धक्का लागला. गाडी आडवी मारली, अशी कारणे देऊन वाद घालतानाच त्यांच्या सहकाऱ्यांकडून प्रवाशांची लूट केली जाते. त्यामुळे नागरिकांनी चोरट्यांच्या अशा क्लुप्त्यांना बळी न पडता सावधानता बाळगणे गरजेचे बनले असून रस्त्यावर आपत्कालीन स्थितीत वादात न पडता तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधणे, पत्ता सांगताना अनोळखी व्यक्तीपासून दोन हात दूर राहणे, वाहनावर बसलेल्या व्यक्तीशी बोलणे टाळणे हेच अशा लुटीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांच्या हिताचे ठरणारे आहे.

---

कन्नमवार पुलाखाली नेऊन होते लूट

मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात एका प्रवाशाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने काही जणांनी दुचाकीवर बसवून कन्नमवार पुलाखाली नेत चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना घडली होती. परिसरातील टवाळखोरांकडून अशाप्रकारे प्रवाशांना इच्छितस्थळी सोडण्याचे सांगून रिक्षात बसवून अथवा दुचाकीवर बसवून कन्नमवार पुलाखाली नेत लूटमार करण्याचे प्रकार केले जात असल्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्या आहेत.

---

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते

१) अनेकदा आपण रस्त्याने रात्री-अपरात्री जात असताना वाटेत कुठेतरी वाद झाल्याचे दिसते. रस्त्याच्या मधोमध घोळका करून लोक उभे राहतात. त्यामुळे प्रवासी नेमके काय झालेय हे पाहण्यासाठी थांबतात आणि इथेच मोठी चूक घडते.

२)रस्त्यात वाद घालणारे हे चोरट्यांचे टोळके असते. हे जेव्हा लक्षात येते तेव्हा प्रवाशांच्या पायाखालची वाळू सरकते. नाशिक शहर व परिसरात अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात समोर आल्या नसल्या तरी शहर व जिल्ह्याबाहेर जाताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

----

काय काळजी घ्याल...

प्रवासाला निघताना वाटेत निर्जनस्थळी कोठेही थांबू नये. काहीजण प्रवाशांना वाहन थांबवून खाली उतरण्यासाठी विनाकारण वाद घालत असल्याचे भासवत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी वाहन थांबवू नये, अशा घटनेचे गांभीर्य ओळखून त्याविषयी पोलिसांना माहिती द्यावी. अशाप्रकारे काळजी घेतली तर आपली फसगत टाळून प्रवास सुखकर करणे निश्चितच शक्य असल्याचे पोलीस सांगतात.