शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
3
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
4
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
5
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
6
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
7
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
8
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
9
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
10
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
11
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
12
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
13
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
14
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
15
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
16
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
17
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
18
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
19
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
Daily Top 2Weekly Top 5

शासन धोरणामुळे बळीराजा चिंंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:36 IST

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाने कांदा निर्यातशुल्क वाढीबरोबर आयातीचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिल्याने आठवडाभरात वाढलेल्या कांदा भावाची झपाट्याने घसरण सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शेतकºयांच्या कांद्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत होते. उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे ...

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाने कांदा निर्यातशुल्क वाढीबरोबर आयातीचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिल्याने आठवडाभरात वाढलेल्या कांदा भावाची झपाट्याने घसरण सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शेतकºयांच्या कांद्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत होते. उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे शेतकºयांच्या पदारात पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी कुटुंबात समाधान व्यक्त होऊ लागले होते. असे असतांना ग्राहकांच्या भल्यासाठी व शहरी ग्राहकांची मर्जी राखत विकत घेणारे महत्त्वाचे मानून केंद्र शासनाने लगेच निर्यातीवर मूल्य लावण्याचे व कांदा आयातीचे संकेत दिल्याने व्यापारी वर्गाने लागलीच कांदा घसरणीस सुरूवात केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. गेल्या आठवड्यात क्विंटल मागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांनी भाव कमी झाल्यामुळे बळीराजा नाराज झाला आहे. शेतकºयांच्या कोणत्याही मालास योग्य बाजारभाव मिळण्याची वेळ आली की शहरी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते. अशी परिस्थिती कायमचीच आहे.शेतकºयांच्या जखमेवर मीठसध्या बाजारात विक्र ीस येत असलेला कांदा उत्पादक शेतकºयांनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून साठविलेला आहे. सध्या देशांतर्गतच कांद्याला मोठी मागणी व कांदा साठा अल्प प्रमाणात असताना इजिप्त देशातून कांदा आयात करण्याचे केंद्र शासनाचे संकेत शेतकºयांना आर्थिक संकटात पाडणारे आहे. शेतीपिकांना हमीभाव न देणाºया शासनाने बळीराजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार करू नये, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.शेजारच्या राज्यांमध्ये कांदा उत्पादन घटल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढल्यामुळे सध्या कांद्यास योग्य बाजारभाव मिळत आहे; मात्र कृषिप्रधान देशातच फक्त शेतकºयांना स्वत:च्या मालाचे दर स्वत:ला ठरविता येत नाही. कष्ट करून शेतात पिकविलेल्या मालाला योग्य बाजारभावाअभावी शेतकरी कुटुंब दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.