शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

शासन धोरणामुळे बळीराजा चिंंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:36 IST

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाने कांदा निर्यातशुल्क वाढीबरोबर आयातीचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिल्याने आठवडाभरात वाढलेल्या कांदा भावाची झपाट्याने घसरण सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शेतकºयांच्या कांद्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत होते. उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे ...

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाने कांदा निर्यातशुल्क वाढीबरोबर आयातीचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिल्याने आठवडाभरात वाढलेल्या कांदा भावाची झपाट्याने घसरण सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शेतकºयांच्या कांद्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत होते. उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे शेतकºयांच्या पदारात पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी कुटुंबात समाधान व्यक्त होऊ लागले होते. असे असतांना ग्राहकांच्या भल्यासाठी व शहरी ग्राहकांची मर्जी राखत विकत घेणारे महत्त्वाचे मानून केंद्र शासनाने लगेच निर्यातीवर मूल्य लावण्याचे व कांदा आयातीचे संकेत दिल्याने व्यापारी वर्गाने लागलीच कांदा घसरणीस सुरूवात केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. गेल्या आठवड्यात क्विंटल मागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांनी भाव कमी झाल्यामुळे बळीराजा नाराज झाला आहे. शेतकºयांच्या कोणत्याही मालास योग्य बाजारभाव मिळण्याची वेळ आली की शहरी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते. अशी परिस्थिती कायमचीच आहे.शेतकºयांच्या जखमेवर मीठसध्या बाजारात विक्र ीस येत असलेला कांदा उत्पादक शेतकºयांनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून साठविलेला आहे. सध्या देशांतर्गतच कांद्याला मोठी मागणी व कांदा साठा अल्प प्रमाणात असताना इजिप्त देशातून कांदा आयात करण्याचे केंद्र शासनाचे संकेत शेतकºयांना आर्थिक संकटात पाडणारे आहे. शेतीपिकांना हमीभाव न देणाºया शासनाने बळीराजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार करू नये, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.शेजारच्या राज्यांमध्ये कांदा उत्पादन घटल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढल्यामुळे सध्या कांद्यास योग्य बाजारभाव मिळत आहे; मात्र कृषिप्रधान देशातच फक्त शेतकºयांना स्वत:च्या मालाचे दर स्वत:ला ठरविता येत नाही. कष्ट करून शेतात पिकविलेल्या मालाला योग्य बाजारभावाअभावी शेतकरी कुटुंब दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.