शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कांदा उत्पादक-व्यापाºयांवर सरकारने केली ‘दरोडेखोरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:52 IST

आॅगस्ट महिन्यात कधी नव्हे ते कांदा उत्पादक शेतकºयांना चांगले भाव मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र केंद्र सरकारने कांद्याचे भाव कमी होण्यासाठी नियोजनपूर्वक कांदा व्यापाºयांवर छापे टाकले. केंद्र सरकारची ही कृती म्हणजे कांदा उत्पादकांच्या खिशावर एकप्रकारे दरोडेखोरीच असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी केला.

नाशिक : आॅगस्ट महिन्यात कधी नव्हे ते कांदा उत्पादक शेतकºयांना चांगले भाव मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र केंद्र सरकारने कांद्याचे भाव कमी होण्यासाठी नियोजनपूर्वक कांदा व्यापाºयांवर छापे टाकले. केंद्र सरकारची ही कृती म्हणजे कांदा उत्पादकांच्या खिशावर एकप्रकारे दरोडेखोरीच असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी केला.  आॅगस्ट महिन्यात कांद्याचे क्ंिवटलला भाव २४०० ते २५०० रुपये होते. दिल्लीत कांदा महाग होऊ लागल्यानेच तातडीने आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना बोलावून केंद्र सरकारने कांदा व्यापाºयांना ठरवून निशाणा करीत त्यांच्यावर छापेमारी केली. त्यामुळे कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाली. कांद्याचे भाव कमी करण्यासाठीच केंद्र सरकारने कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याचा आरोप आ. बच्चू कडू यांनी केला.  कांद्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करणेच मुळात चुकीचे आहे. कांद्याला हमीभाव नसताना त्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करायला नको. एकतर कांद्याला हमीभाव जाहीर करा, मगच कांद्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करावा अन्यथा कांद्याला जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळले पाहिजे. कांदा न खाल्ल्याने कोणी मरत नाही. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर लवकरच आंदोलन करण्याचा प्रहार संघटनेचा प्रयत्न आहे. त्यासाठी येत्या पंधरा दिवसात चांदवड किंवा अन्यत्र कांदा उत्पादकांची परिषद घेऊन त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांगळे, दत्तू मुतर्डक, अजित आव्हाड, अनिल भडांगे, जगन काकडे, नितीन गवळी, प्रकाश चव्हाण, श्याम गोसावी, जतीन पानमंद, योगेश जाधव, सुशील शिंदे, बबलू मिर्झा, पवन ताडगे आदी उपस्थित होते.१३ आॅक्टोबरला उपोषणअपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी व्हावी, विधवांसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यात यावे, अपंगांसाठी उद्योग व शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी अनुकंपा लागू करावी, यामागण्यांसाठी अमरावती येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.