शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बार, रेस्टॉरंट मालकांवर उपासमार

By admin | Updated: April 6, 2017 01:46 IST

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेल्या बिअरबार व रेस्टॉरंट मालकांवरतसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेल्या बिअरबार व रेस्टॉरंट मालकांवर तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, कोट्यवधीची गुंतवणूक करताना विविध बॅँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आता बॅँकांही तगादा लावत असल्याने या साऱ्या संकटातून मार्ग काढावा, अशी मागणी असोसिएशन आॅफ रुरल परमिट रूम ओनर्स, नाशिक या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बुधवारी शेकडो बार मालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०१६ च्या आदेशाबाबत निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, शासनाच्या सर्व अटी, शर्तींचे पालन करून आम्हाला व्यवसायाचा परवाना मिळाला असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच महामार्ग, राज्यमार्गावर जादा पैसे मोजून हॉटेलसाठी जागा खरेदी कराव्या लागल्या आहेत. अगोदरच विविध अडचणीतून परमिट रूम, बिअरबार व हॉटेल व्यवसाय वाटचाल करीत असताना व दरवर्षी शासनाचा मोठा महसूल भरत असतानाही न्यायालयाने त्याचा कोणताही विचार केलेला नाही.आमच्यावर अवलंबून असलेले कूक, वेटर, हेल्पर, सिक्युरिटी, चपाती, भाकरी करणाऱ्या महिला, भांडी धुणाऱ्या महिला, भाजीपाला पुरविरणारे पुरवठादार, तसेच बचत गटांकडून पापड, स्नॅक्सचे पदार्थ पुरविणाऱ्या अशा समाजघटकातील अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. (प्रतिनिधी)