शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बार, रेस्टॉरंट मालकांवर उपासमार

By admin | Updated: April 6, 2017 01:46 IST

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेल्या बिअरबार व रेस्टॉरंट मालकांवरतसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेल्या बिअरबार व रेस्टॉरंट मालकांवर तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, कोट्यवधीची गुंतवणूक करताना विविध बॅँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आता बॅँकांही तगादा लावत असल्याने या साऱ्या संकटातून मार्ग काढावा, अशी मागणी असोसिएशन आॅफ रुरल परमिट रूम ओनर्स, नाशिक या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बुधवारी शेकडो बार मालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०१६ च्या आदेशाबाबत निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, शासनाच्या सर्व अटी, शर्तींचे पालन करून आम्हाला व्यवसायाचा परवाना मिळाला असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच महामार्ग, राज्यमार्गावर जादा पैसे मोजून हॉटेलसाठी जागा खरेदी कराव्या लागल्या आहेत. अगोदरच विविध अडचणीतून परमिट रूम, बिअरबार व हॉटेल व्यवसाय वाटचाल करीत असताना व दरवर्षी शासनाचा मोठा महसूल भरत असतानाही न्यायालयाने त्याचा कोणताही विचार केलेला नाही.आमच्यावर अवलंबून असलेले कूक, वेटर, हेल्पर, सिक्युरिटी, चपाती, भाकरी करणाऱ्या महिला, भांडी धुणाऱ्या महिला, भाजीपाला पुरविरणारे पुरवठादार, तसेच बचत गटांकडून पापड, स्नॅक्सचे पदार्थ पुरविणाऱ्या अशा समाजघटकातील अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. (प्रतिनिधी)