शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

बार, रेस्टॉरंट मालकांवर उपासमार

By admin | Updated: April 6, 2017 01:46 IST

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेल्या बिअरबार व रेस्टॉरंट मालकांवरतसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेल्या बिअरबार व रेस्टॉरंट मालकांवर तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, कोट्यवधीची गुंतवणूक करताना विविध बॅँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आता बॅँकांही तगादा लावत असल्याने या साऱ्या संकटातून मार्ग काढावा, अशी मागणी असोसिएशन आॅफ रुरल परमिट रूम ओनर्स, नाशिक या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बुधवारी शेकडो बार मालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०१६ च्या आदेशाबाबत निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, शासनाच्या सर्व अटी, शर्तींचे पालन करून आम्हाला व्यवसायाचा परवाना मिळाला असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच महामार्ग, राज्यमार्गावर जादा पैसे मोजून हॉटेलसाठी जागा खरेदी कराव्या लागल्या आहेत. अगोदरच विविध अडचणीतून परमिट रूम, बिअरबार व हॉटेल व्यवसाय वाटचाल करीत असताना व दरवर्षी शासनाचा मोठा महसूल भरत असतानाही न्यायालयाने त्याचा कोणताही विचार केलेला नाही.आमच्यावर अवलंबून असलेले कूक, वेटर, हेल्पर, सिक्युरिटी, चपाती, भाकरी करणाऱ्या महिला, भांडी धुणाऱ्या महिला, भाजीपाला पुरविरणारे पुरवठादार, तसेच बचत गटांकडून पापड, स्नॅक्सचे पदार्थ पुरविणाऱ्या अशा समाजघटकातील अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. (प्रतिनिधी)