शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

बार व्यावसायिकांनी बदलले प्रवेशद्वार

By admin | Updated: May 8, 2017 01:54 IST

नाशिकमधील अनेक मद्यविक्रीच्या दुकानदारांनी अचानक प्रवेशद्वाराच्या दिशा बदलून घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा बरकत प्राप्त होऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : एरव्ही मद्याची दुकाने कोणत्याही दिशेला असली तरी ती वेगाने चालतातच, त्याला वास्तुशास्त्राचे नियम लागू होत नाही का? असा प्रश्न सुजाण नागरिक सोशल मीडियावर करीत असतात. त्यात खरोखरच तथ्यही दिसत असते. आता मात्र नाशिकमधील अनेक मद्यविक्रीच्या दुकानदारांनी अचानक प्रवेशद्वाराच्या दिशा बदलून घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा बरकत प्राप्त होऊ लागली आहे. ‘दिशा’ बदलली आणि लगेचच ‘दशा’ही बदलली गेली.मद्याच्या व्यवसायाचे अजब गणित आहे. बार असो अथवा लिकर शॉप तो कोणत्याही दिशेला म्हणजे एरव्ही दक्षिण दिशा वर्ज्य मानली जात असताना दक्षिणाभिमुख असलेली दुकानेही तितक्याच जोमाने चालतात. शिवाय कोणत्याही अर्थसंकल्पात कराचा भार किंवा अधिभार वाढवायचा ठरवला की, मद्य हे गृहीतच धरले जाते. परंतु इतका करभार सोसूनही व्यावसायिक आणि मदिराभक्त चकार शब्द काढत नाहीत वा विरोध करीत नाही. त्यांच्या या सहनशील वृत्तीची मनोरंजनात्मक चर्चा विविध पोस्टच्या रूपाने सोशल मीडियावर नेहमीच होत असते. परंतु आता मात्र जणू सर्वच मद्य व्यावसायिक जरा ‘भावनिक’ बनले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत मद्य दुकानदार आणि बारला परवानगी नाकारली आणि अनेकांच्या पोटात भीतीचा घोळा उभा राहिला. अशा भीती आणि उदरनिर्वाहावरील गंडांतरामुळेच अनेक व्यावसायिकांनी दिशा दर्शनाचा आधार घेतला आणि बघता बघता जिल्ह्यातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या प्रवेशद्वाराची दिशाच बदलली.काहीसे आश्चर्य वाटले तरी यात दुकानदारांचे हे वास्तुशास्त्रावरील श्रद्धेपोटी उचलले पाऊल नाही तर ‘कायदेशीर’ पाऊल आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आतील सर्व बार आणि दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या बार व्यावसायिक आणि दुकानदारांच्या उदरनिर्वाहावर गंडांतर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील १११६ अनुज्ञप्तीधारकांपैकी ७६३ परवाने केवळ एका आदेशासरशी रद्द झाले आहेत. परंतु तसे होऊ नये यासाठी शासनाच्या कायदेशीर अंतर मर्यादचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी शक्कल लढविली. महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या काठावर म्हणजेच ४८० किंवा ४९० मीटर अंतरात मद्याचे दुकान येत असेल तर ते पाचशे मीटर बाहेर दाखवण्यासाठी या क्लृप्त्या लढविण्यात आल्या आहेत. मोठ्या भूखंडावर असलेल्या बारचे प्रवेशद्वार हे पाचशे मीटर अंतराच्या आत येत असेल तर ते अन्य बाजूने म्हणजे पाचशे मीटर अंतराबाहेर प्रवेशद्वार असावे यासाठी शहरासह जिल्ह्यातील अनेक बारचालकांनी अशाप्रकारचे बदल आपल्या बारच्या रचनेत करून घेतले आहेत.