शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बार व्यावसायिकांनी बदलले प्रवेशद्वार

By admin | Updated: May 8, 2017 01:54 IST

नाशिकमधील अनेक मद्यविक्रीच्या दुकानदारांनी अचानक प्रवेशद्वाराच्या दिशा बदलून घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा बरकत प्राप्त होऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : एरव्ही मद्याची दुकाने कोणत्याही दिशेला असली तरी ती वेगाने चालतातच, त्याला वास्तुशास्त्राचे नियम लागू होत नाही का? असा प्रश्न सुजाण नागरिक सोशल मीडियावर करीत असतात. त्यात खरोखरच तथ्यही दिसत असते. आता मात्र नाशिकमधील अनेक मद्यविक्रीच्या दुकानदारांनी अचानक प्रवेशद्वाराच्या दिशा बदलून घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा बरकत प्राप्त होऊ लागली आहे. ‘दिशा’ बदलली आणि लगेचच ‘दशा’ही बदलली गेली.मद्याच्या व्यवसायाचे अजब गणित आहे. बार असो अथवा लिकर शॉप तो कोणत्याही दिशेला म्हणजे एरव्ही दक्षिण दिशा वर्ज्य मानली जात असताना दक्षिणाभिमुख असलेली दुकानेही तितक्याच जोमाने चालतात. शिवाय कोणत्याही अर्थसंकल्पात कराचा भार किंवा अधिभार वाढवायचा ठरवला की, मद्य हे गृहीतच धरले जाते. परंतु इतका करभार सोसूनही व्यावसायिक आणि मदिराभक्त चकार शब्द काढत नाहीत वा विरोध करीत नाही. त्यांच्या या सहनशील वृत्तीची मनोरंजनात्मक चर्चा विविध पोस्टच्या रूपाने सोशल मीडियावर नेहमीच होत असते. परंतु आता मात्र जणू सर्वच मद्य व्यावसायिक जरा ‘भावनिक’ बनले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत मद्य दुकानदार आणि बारला परवानगी नाकारली आणि अनेकांच्या पोटात भीतीचा घोळा उभा राहिला. अशा भीती आणि उदरनिर्वाहावरील गंडांतरामुळेच अनेक व्यावसायिकांनी दिशा दर्शनाचा आधार घेतला आणि बघता बघता जिल्ह्यातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या प्रवेशद्वाराची दिशाच बदलली.काहीसे आश्चर्य वाटले तरी यात दुकानदारांचे हे वास्तुशास्त्रावरील श्रद्धेपोटी उचलले पाऊल नाही तर ‘कायदेशीर’ पाऊल आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आतील सर्व बार आणि दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या बार व्यावसायिक आणि दुकानदारांच्या उदरनिर्वाहावर गंडांतर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील १११६ अनुज्ञप्तीधारकांपैकी ७६३ परवाने केवळ एका आदेशासरशी रद्द झाले आहेत. परंतु तसे होऊ नये यासाठी शासनाच्या कायदेशीर अंतर मर्यादचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी शक्कल लढविली. महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या काठावर म्हणजेच ४८० किंवा ४९० मीटर अंतरात मद्याचे दुकान येत असेल तर ते पाचशे मीटर बाहेर दाखवण्यासाठी या क्लृप्त्या लढविण्यात आल्या आहेत. मोठ्या भूखंडावर असलेल्या बारचे प्रवेशद्वार हे पाचशे मीटर अंतराच्या आत येत असेल तर ते अन्य बाजूने म्हणजे पाचशे मीटर अंतराबाहेर प्रवेशद्वार असावे यासाठी शहरासह जिल्ह्यातील अनेक बारचालकांनी अशाप्रकारचे बदल आपल्या बारच्या रचनेत करून घेतले आहेत.