शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

बार व्यावसायिकांनी बदलले प्रवेशद्वार

By admin | Updated: May 8, 2017 01:54 IST

नाशिकमधील अनेक मद्यविक्रीच्या दुकानदारांनी अचानक प्रवेशद्वाराच्या दिशा बदलून घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा बरकत प्राप्त होऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : एरव्ही मद्याची दुकाने कोणत्याही दिशेला असली तरी ती वेगाने चालतातच, त्याला वास्तुशास्त्राचे नियम लागू होत नाही का? असा प्रश्न सुजाण नागरिक सोशल मीडियावर करीत असतात. त्यात खरोखरच तथ्यही दिसत असते. आता मात्र नाशिकमधील अनेक मद्यविक्रीच्या दुकानदारांनी अचानक प्रवेशद्वाराच्या दिशा बदलून घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा बरकत प्राप्त होऊ लागली आहे. ‘दिशा’ बदलली आणि लगेचच ‘दशा’ही बदलली गेली.मद्याच्या व्यवसायाचे अजब गणित आहे. बार असो अथवा लिकर शॉप तो कोणत्याही दिशेला म्हणजे एरव्ही दक्षिण दिशा वर्ज्य मानली जात असताना दक्षिणाभिमुख असलेली दुकानेही तितक्याच जोमाने चालतात. शिवाय कोणत्याही अर्थसंकल्पात कराचा भार किंवा अधिभार वाढवायचा ठरवला की, मद्य हे गृहीतच धरले जाते. परंतु इतका करभार सोसूनही व्यावसायिक आणि मदिराभक्त चकार शब्द काढत नाहीत वा विरोध करीत नाही. त्यांच्या या सहनशील वृत्तीची मनोरंजनात्मक चर्चा विविध पोस्टच्या रूपाने सोशल मीडियावर नेहमीच होत असते. परंतु आता मात्र जणू सर्वच मद्य व्यावसायिक जरा ‘भावनिक’ बनले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत मद्य दुकानदार आणि बारला परवानगी नाकारली आणि अनेकांच्या पोटात भीतीचा घोळा उभा राहिला. अशा भीती आणि उदरनिर्वाहावरील गंडांतरामुळेच अनेक व्यावसायिकांनी दिशा दर्शनाचा आधार घेतला आणि बघता बघता जिल्ह्यातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या प्रवेशद्वाराची दिशाच बदलली.काहीसे आश्चर्य वाटले तरी यात दुकानदारांचे हे वास्तुशास्त्रावरील श्रद्धेपोटी उचलले पाऊल नाही तर ‘कायदेशीर’ पाऊल आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आतील सर्व बार आणि दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या बार व्यावसायिक आणि दुकानदारांच्या उदरनिर्वाहावर गंडांतर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील १११६ अनुज्ञप्तीधारकांपैकी ७६३ परवाने केवळ एका आदेशासरशी रद्द झाले आहेत. परंतु तसे होऊ नये यासाठी शासनाच्या कायदेशीर अंतर मर्यादचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी शक्कल लढविली. महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या काठावर म्हणजेच ४८० किंवा ४९० मीटर अंतरात मद्याचे दुकान येत असेल तर ते पाचशे मीटर बाहेर दाखवण्यासाठी या क्लृप्त्या लढविण्यात आल्या आहेत. मोठ्या भूखंडावर असलेल्या बारचे प्रवेशद्वार हे पाचशे मीटर अंतराच्या आत येत असेल तर ते अन्य बाजूने म्हणजे पाचशे मीटर अंतराबाहेर प्रवेशद्वार असावे यासाठी शहरासह जिल्ह्यातील अनेक बारचालकांनी अशाप्रकारचे बदल आपल्या बारच्या रचनेत करून घेतले आहेत.