शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

भरीव कामांची अंजनेरीला प्रतीक्षा!

By admin | Updated: July 29, 2016 01:44 IST

यंत्रणेपुढे आव्हान : ३४.७१ टक्केच कामे पूर्ण

 संजय वाघ त्र्यंबकेश्वर तालक्यातील अंजनेरी या ४९३४ लोकवस्तीच्या गावाला सुमारे दीड वर्षापूर्वी आदर्श संसद ग्राम योजनेच्या माध्यमातून दत्तक घेण्यात आले... गावकऱ्यांचे हृदय तेव्हा सुपाएवढे झाले होते... विकास, विकास काय म्हणता तो गावाच्या अंगाखांद्यावर ओसंडून वाहील अशी स्वप्ने जो तो रंगवित होता. एकूण १९० कामांचा आणि ६७७.१३ कोटी रुपयांचा सूक्ष्म आराखडा आखण्यात आला. जिल्हाधिकारी स्तरावर बैठकांमागून बैठकाही पार पडल्या. आराखड्याच्या कामात आणि रकमेतही घट झाली. १२१ कामे आणि ६२५ कोटी खर्चावर शिक्कामोर्तब झाले... जितक्या बैठका झाल्या, तेवढ्या प्रमाणात कामांची पूर्तता झाल्याचे वरकरणी सध्या तरी दिसत नाही. १२१ पैकी अवघी ४२ कामे (३४.७१ टक्के) पूर्ण झालेली असली तरी भरीव अशा कामांची अंजनेरी गावाला प्रतीक्षा लागून आहे.अंजनेरी गावाला हनुमानाची जन्मभूमी म्हणून एक धार्मिक महत्त्व आहे. या पावनभूमीचा शासन योजनेच्या माध्यमातून विकास घडवून आणावा या उद्देशाने खासदार गोडसे यांनी हे गाव दत्तक घेतले. त्यांनी प्रयत्नही केले. दीड वर्षात ४२ कामे मार्गी लागली. त्यात तळ्याची वाडी व हनुमाननगर येथे डिजिटल अंगणवाडी, गावातील रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण, ग्रामपंचायत क्षेत्रात एलईडी दिव्यांचा वापर, गावातील विविध वाड्यांमध्ये सौर ऊर्जेचे दिवे आणि सौर पोलवर दिशादर्शक फलक या कामांचा समावेश आहे. ग्राम सचिवालय, स्मशानभूमीत निवारा शेड व संरक्षक भिंत, दऱ्याची वाडीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण, दोन ठिकाणी केटीवेअर आणि अंजनेरी गावठाणात डिजिटल अंगणवाडी ही सहा कामे मंजूर असली तरी प्रत्यक्ष कामाचा अद्याप मुहूर्त लागलेला नाही. २५ लाखाहून अधिक रकमेची दहाच्या वर कामे आजही मंजुरीसाठी रखडलेली आहेत. केंद्र शासनाची योजना तशी उत्तम आहे. पण सरकारी काम आणि सहा महिने थांब असे जे बोलले जाते, त्यातही आता अपूर्णता वाटायला लागली आहे. दीड वर्षाचा काळ उलटला आणि मुदत पूर्ण व्हायला केवळ तीन महिने उरले आहेत. या अल्प वेळेत आराखडा प्रत्यक्षात उतरेल अशी चिन्हे दिसत नाहीत.