शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार वापसी हा स्टंट

By admin | Updated: July 25, 2016 23:56 IST

भैरप्पांची टीका : सावाना शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यात बरसले

नाशिक : सरकारने गेल्या साठ वर्षांत अठरा भाषांमध्ये हजारो साहित्यिकांना पुरस्कार दिले; पण त्यापैकी अवघ्या तीस जणांनी पुरस्कार परत केले. त्या सर्वांच्या निष्ठा डाव्यांशी एकवटलेल्या होत्या. मोदी सरकार आल्यामुळे बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वापसी हा स्टंट होता. म्हणूनच निवडणूक झाल्यावर पुरस्कार वापसीही थांबली, अशी घणाघाती टीका प्रख्यात कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांनी केली.सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात भैरप्पा यांनी ‘भारतीयत्व व भारतीय साहित्य’ या विषयावर संवाद साधला. ते म्हणाले, मोदी सरकार आल्यावर साहित्यिकांनी पुरस्कार वापसी सुरू केली. माध्यमांनीही त्यांना प्रसिद्धी दिली; मात्र बिहार निवडणुकीनंतर हे सगळेच थांबले. हे सारे लोक कम्युनिस्टांशी संबंधित होते. कम्युनिस्टांनी आधी देशात सत्ता मिळवण्याचे प्रयत्न केले. ते न जमल्याने त्यांनी साहित्य, शिक्षणासारख्या क्षेत्रावर पगडा निर्माण केला. नुकतेच घडलेले जेएनयू प्रकरण याचेच उदाहरण आहे. अनेक शिक्षक, प्राध्यापक डाव्या विचारांचे असून, त्यांना लाखभर रुपये पगार दिला जातो. तेवढा पगार घेण्याइतकी त्यांची पात्रता तरी आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भारतीय साहित्याबद्दल बोलताना भैरप्पा म्हणाले, भारतावर अनेक आक्रमणे झाली. मुस्लीम शासनकर्त्यांच्या काळात देशातील ३५ हजार मंदिरे पाडली गेली, वेद व अन्य साहित्य नष्ट करण्यात आले; मात्र आपले तत्त्वज्ञान व भाषा टिकून राहिली. ब्रिटिश सत्ताकाळात आपण इंग्रजीसह युरोपीय साहित्य वाचू लागलो. याच काळात भारतात नव्या साहित्याचा उगम झाला. त्याआधी आपल्याकडे बोधकथा वा पुराणकथांचे कथन होत असे. नंतर आपल्या कादंबऱ्यांतून वास्तवाचे चित्रण होऊ लागले खरे; मात्र त्यावर पाश्चात्त्य साहित्याचाच प्रभाव राहिला. आपण पाश्चात्त्यांची शैली उचलून आपल्या प्रथा-परंपरांचे प्रतिबिंब साहित्यात उमटवले. आपले लेखनतंत्र आजही पाश्चात्त्य साहित्यावर आधारलेले आहे. देशातील दारिद्र्यासारख्या समस्या सोडवण्यात तुमचा वाटा काय, या प्रश्नाचे उत्तर आपले साहित्यिक देऊ शकणार नाहीत. साहित्याच्या उद्देशाबाबतच आपले साहित्यिक संभ्रमित आहेत. आपल्याकडचे काही लेखक डावे, काही दलित, तर काही स्त्रीवादी असतात; पण भारतीय लेखक कधी होणार? त्यासाठी भारतीय साहित्य, तत्त्वज्ञान वाचावे लागेल. पाश्चात्त्यांची वचने उद्धृत करणाऱ्यांना भारताबद्दल काहीच माहीत नसते. सध्याच्या लेखकांना अभ्यासाचे वावडे आहे. त्यामुळे त्यांच्यात सर्जनशीलतेचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली. प्रख्यात हिंदी साहित्यिक डॉ. विष्णू खरे, ज्येष्ठ लेखिका उमा कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, अरविंद बेळे, सुरेश गायधनी आदि व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी प्रास्ताविक केले. किशोर पाठक, चंद्रकांत संकलेचा यांनी परिचय करून दिला. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.