शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

शिवसेनेच्या आजच्या घोषणेकडे लक्ष

By admin | Updated: May 19, 2017 00:23 IST

भाजपा टार्गेट : राजकीय वर्तुळात उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी आत्महत्या, कर्जमुक्ती, समृद्धी महामार्ग, तूर खरेदी यांसारख्या राज्याला भेडसाविणाऱ्या साऱ्या प्रश्नांना भारतीय जनता पक्ष व पर्यायाने या पक्षाचे मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा एकतर्फी निष्कर्ष काढून त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात यापूर्वीच उभ्या केलेल्या शिवसेनेने शुक्रवारच्या कृषी अधिवेशनात सरकार विरुद्ध आणखी मोठी घोषणा केली जाण्याची व्यक्त केलेल्या शक्यतेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांना अधिवेशनाची माहिती देताना भारतीय जनता पक्ष व राज्य सरकारवर प्रत्येक प्रश्नावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना नोटाबंदीदेखील कारणीभूत असल्याचे सांगून अप्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील टीकेचे लक्ष्य केले. तूर खरेदीच्या प्रश्नावर सरकार गोंधळेले असल्याचे तर समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा स्वप्नवत प्रकल्प असल्याने त्यात शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नसल्याचे सांगून शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभी राहील, अशी भूमिकाही या नेत्यांनी जाहीर करून टाकली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनावर लॉँगमार्च काढण्याचा इशाराही देऊन टाकण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना जे काही आगामी काळात करणार त्या त्या आंदोलनाची तसेच राज्यापुढील प्रश्नांना सरकारच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून भाजपावर विरोधी पक्षांनी करावी तशी टीका केलेली आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यापासूनच भाजपावर नाराज असल्याचे आजवर लपून राहिलेले नाही. मध्यंतरीच्या काळात टोकाची भूमिका घेऊन सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे खिशात ठेवल्याचेही जाहीर करण्यात आले होते. कालापव्ययात या राजीनाम्याचे काय झाले हे कळू शकले नसले तरी, सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे त्यांच्या राज्यव्यापी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून दिसू लागले आहे. त्यामुळे कृषी अधिवेशनाची माहिती देताना सेना नेत्यांनी ज्या पद्धतीने साऱ्या गोष्टींना भाजपाच जबाबदार असल्याचे ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला ते पाहता उद्धव ठाकरे त्याहीपेक्षा पुढे जाऊन काही तरी मोठी घोषणा करतील याविषयी साशंकता नसली तरी, ती घोषणा काय असेल याविषयीची उत्सुकता लागून आहे. शिवसेनेने ताणली उत्सुकता काही तरी महत्त्वाची भूमिका शिवसेना या अधिवेशनात घेणार असून, त्याची मोठी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच करणार असल्याचे सांगून सेना नेत्यांनी साऱ्यांचीच उत्सुकता ताणून धरली आहे.