शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

दखणी-मोमीन वाद पेटविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 25, 2017 01:35 IST

महापालिका स्थापनेला १७ वर्षे उलटूनही शहराचा बकालपणा, रखडलेला विकास, शहरातील नागरी समस्या ‘जैसे थे’च आहे.

 अतुल शेवाळे मालेगावमहापालिका स्थापनेला १७ वर्षे उलटूनही शहराचा बकालपणा, रखडलेला विकास, शहरातील नागरी समस्या ‘जैसे थे’च आहे. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणासाठी जुनाच दखणी-मोमीन वाद पेटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मतदार या राजकीय खेळीला किती महत्त्व देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शहराच्या पूर्व भागात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल अशीे सरळ लढत होत असून, एमआयएम या तिन्ही पक्षांपुढे आव्हान उभे करणार आहे. शहराच्या पूर्व भागात सध्या जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरदार सभा होत आहेत. सभांना गर्दीदेखील होत आहे. या सभांमध्ये विकासाचा मुद्दा चर्चिला जाणे अपेक्षित होते. राष्ट्रवादी व जनता दलाने गेल्या काही वर्षांत नागरिकांसाठी कोणती ठोस कामे केली हे मतदारांना पटविणे गरजेचे असताना काँग्रेस व इतर पक्षांना कोंडीत पकडण्यासाठी बिरादरीचा वाद उकरून काढला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दलाची मनपा निवडणुकीत युती झाली असली तरी दोघा पक्षांच्या नेत्यांमध्ये वर्चस्वासाठी शीतयुद्ध सुरू आहे. एकमेकांमध्ये कोण सरस आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिका स्थापनेला १७ वर्ष व तीन पंचवार्षिक निवडणुका होऊनही शहरातील नागरिक प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहेत. या प्रश्नांवर बोलण्याऐवजी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून जातपात व वैयक्तिक टीकेवर भर दिला जात आहे. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला यश आल्यानंतर अडीच वर्षे काँग्रेसकडे महापौरपद होते. त्यानंतर आमदारकीही मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात टाकली. असे असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून मतदारांना बुमरँग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रारंभी एमआयएम पक्ष प्रमुख विरोधकाची भूमिका बजावेल अशी चिन्हे दिसत होती; मात्र सध्यस्थितीत एमआयएम काही वॉर्डांपुरताच सीमित राहिल्याचे दिसून येत आहे. पाच ते सहा प्रभागांमध्येच एमआयएमकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागात काँग्रेस-राष्ट्रवादी-जनता दल अशी तिरंगी लढत होणार आहे.