शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वाहनांची संख्या आटोक्यात आणण्याचा महंतांचा प्रयत्न

By admin | Updated: September 18, 2015 00:35 IST

तिसरी शाही मिरवणूक : रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात पहिल्या व दुसऱ्या शाहीस्नान मिरवणुकीत वाढत्या वाहनरथ संख्येमुळे तिन्ही अनी आखाड्याांच्या मिरवणुकांचे रथ एकमेकांत घुसून मोठा गोंधळ उडाला होता. तिसऱ्या शाही मिरवणुकीत असा गोंधळ उठू नये म्हणून एका वाहन रथात दोनपेक्षा जास्त महंतांना बसवून वाहनरथांची संख्या आटोक्यात आणता येईल काय? यावर मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला प्रमुख महंतांमध्ये विचार विनिमय सुरू होता, परंतु खालशांचे महंत ही गोष्ट मान्य करतील काय याचीही चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.अखिल भारतीय श्री पंच दिगंबर आखाड्याचे ४३० खालसे असून, श्री महंत, महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर आदिंची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे शाही मिरवणुकीत दिगंबर आखाड्याची वाहनरथ संख्यादेखील सर्वाधिक असते. त्याखालोखाल निर्वणी अनी आखाड्यांच्या खालशांची सव्वाशेच्या आसपास असून, निर्मोहीची खालसा संख्या पाऊणशेपर्यंत आहे. त्यातच दिगंबर आखाड्याची मिरवणूक ही मध्यभागी असल्याने शेवटी मिरवणूक असलेल्या आखाड्याच्या खालशांची मोठी कुचंबणा होते. कारण दिगंबरची मिरवणूक वाढत्या वाहन संख्येमुळे लांबल्याने शाहीस्नानासाठीदेखील विलंब होतो आणि वाहनरथांना खूप वेळ ताटकळत मिरवणूक मार्गावर शेवटी थांबावे लागते. त्यामुळे पहिल्या शाहीस्नानाच्या मिरवणुकीदरम्यान शेवटच्या क्रमांक राहिलेल्या निर्मोही आखाड्याची वाहने दिंगबरची मिरवणूक अर्ध्यावर आली असताना मध्येच घुसली होती. तोच प्रकार दुसऱ्या मिरवणुकीत देखील घडला होता. निर्वाणी आखाड्याचे वाहनरथ दिंगबर आखाड्याच्या मिरवणुकीत घुसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर काही वरिष्ठ महंतांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळून मिरवणूक शांततेत पार पडली. असाच प्रकार तिसऱ्यांदादेखील घडू नये म्हणून निर्वाणी आणि निर्मोही आखाड्याचे महंत काळजी घेत आहेत. आमच्या आखाड्याची संख्या कमी असल्याने मिरवणूक आटोपशीरच असते. यावेळीही आम्ही पहिल्याच क्रमांकावर मिरवणुकीत आहोत, असे निर्मोहीचे अध्यक्ष महंत राजेंद्रदास यांनी सांगितले, परंतु ज्या आखाड्यात महंताची आणि महामंडलेश्वरांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यांनी एकाच वाहन रथावर विराजमान व्हावे, असेही स्पष्ट केले, तर दुसरीकडे दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामकिशोर शास्त्री म्हणाले की, आमचा आखाडा प्रमुख असून, मध्यभागी असतो. (प्रतिनिधी)