वाईकर : ७४ व्या ज्योतिष प्रसार दिंडीचे उद्घाटननाशिक : ज्योतिष ही एक विद्या आहे. तिचा योग्य अभ्यास करून तिच्या प्रसारासाठी रजिस्टर्ड संस्थांची संख्या वाढली पाहिजे. ज्योतिषविद्येला विद्यापीठात मान्यता मिळण्यासाठी सर्वांनी एक व्हावे, असे आवाहन ज्योतिषतज्ज्ञ कृष्णराव वाईकर यांनी केले. बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आयोजित ७४ व्या ज्योतिष प्रसार दिंडीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हाणाले ज्योतिषाच्या वाढत्या प्रसाराबरोबर आपली जबाबदारीही वाढली आहे. पोटभरू ज्योतिषांमुळे ज्योतिष विद्येवर आरोप केले जातात. त्यामुळे ज्योतिष सांगणार्यांनी पंचांगाचा अभ्यास करून, पंचांगाचा कायदा पाळूनच ज्योतिष सांगावे, असे आवहन करीत त्यांनी सर्व अभ्यासक आणि ज्योतिषांनी एका छताखाली यावे आणि विद्येला मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. ज्योतिष परीषदेनेही अभ्यासपूर्ण प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. दिंडीचे उद्घाटक देशदूतचे कार्यकारी संचालक मिलिंद सजगुरे यांनी देशोदेशीच्या ज्योतिष विद्येबद्दल माहिती दिली. ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी प्रास्तविक करताना कुटुंब व्यवस्था उभी करण्यासाठी ज्योतिष विद्याच काम करू शकते असे सांगून ज्योतिषाला विद्यापीठात मान्यता मिळाल्याशिवाय त्यात प्रगती होणार नाही, असे सांगत ती मिळविण्यासाठी सर्वांनी एक व्हावे असे आवाहन केले. नाशिकचे ज्योतिष अभ्यासक लक्ष्मीकांत जोशी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्तकेले. प्रारंभी मिलिंद सजगुरे यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी हरदास रामराव, अनिल भार्गवे, संजय रत्नाकर आदि उपस्थित होते. ॲड. मालती शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उद्या दि. २४ पासून दोन सत्रात २५ मेपर्यंत चर्चासत्र होणार असून, त्यात विविध ज्योतिष अभ्यासक त्यांचे मत मांडणार आहेत.
ज्योतिषांनी एका छताखाली यावे
By admin | Updated: May 24, 2014 00:30 IST