शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

कृत्रिम पाणीटंचाई : वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: September 17, 2015 22:49 IST

पाच गाव पाणीपुरवठा योजना बंद

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे तीन महिन्यांपासून वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत नांदूरशिंगोटे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा समितीने तत्काळ उपाययोजना करून पाणी योजना सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नांदूरशिंगोटे गावाला नळ पाणीपुरवठा योजनेव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा समितीस अनेकदा वीजबिल भरण्यासंदर्भात तगादा लावल्यानंतरही प्रशासन व समितीकडून वीजबिल न भरल्याने नाइलाजास्तव वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला असल्याचे समजते. कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, मऱ्हळ बुद्रूक आणि मऱ्हळ खुर्द आदि गावांना भोजापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक गावांना दर महिन्याचे पाणीपट्टीही ठरवून देण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पाचही गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.पाणीपुरवठा समिती, प्रशासन, पाचही गावांचे पदाधिकारी यांच्यात नेहमीच समन्वय नसल्याने पाणीपुरवठा योजना विस्कळीत असते. मऱ्हळ बुद्रूक व मऱ्हळ खुर्द या दोन गावांना वेळेवर पाणी जात नाही. तसेच पाणीयोजना सुरळीत राहण्यासाठी पंचायत समिती सभागृहात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या आहेत. परंतु याबाबत योग्य तोडगा अद्यापही निघाला नसल्याने पाणी योजना सुरळीत झाली नाही. महिन्याकाठी योजनेला सव्वा लाखाच्या आसपास देखभाल, दुरुस्ती व वीजबिलाचा खर्च येत आहे. परंतु, नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत वगळता उर्वरित गावांकडून पाहिजे त्या प्रमाणात पाणीपट्टी वसुलीची रक्कम दिली जात नसल्याने योजना चालविताना कसरत करावी लागत आहे. भोजापूर धरणात पाणी असतानाही पाचही गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे मऱ्हळ बुद्रूक व मऱ्हळ खुर्द या दोन्ही ग्रामपंचायतींचे ३५ हजार रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे सचिव जालिंदर वाडगे यांनी दिली. उर्वरित गावांनी पैसे दिले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.वीज वितरण कंपनीने वारंवार नोटीस पाठवून वीजबिल भरण्यास सांगितले होते. याबाबत समितीकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याने वीज वितरण कंपनीने मंगळवारी (दि. १५) वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन दिवसांपासून योजना बंद असल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे. पाणी पिण्यासाठी राखीवसिन्नर : टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी दिली. टंचाईमुळे राज्यातील सर्व पाणीसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तालुक्यात सलग पाचव्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने अद्याप एकही धरण भरले नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील प्रमुख धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. त्यामुळे ज्या धरणांमधून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे त्या धरणांवर महसूल विभागाचे जास्त लक्ष असणार आहे.भोजापूर, सरदवाडी, उंबरदरी, कोनांबे यांच्यासह तालुक्यातील छोट्या-मोठ्या धरणातून शेतीसाठी पाणी उचल तत्काळ बंद करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी केले आहे. भूजल अधिनियमातील तरतुदी अन्वये पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या साठ्यातून शेतीसाठी पाणी घेण्यावर निर्बंध लावण्यात येणार असून, पाण्याची चोरी करण्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार खैरनार यांनी दिली. या मोहिमेत पाटबंधारे विभाग, पोलीस, वीज वितरण कंपनी व महसूल विभाग यांच्या संयुक्त कारवाई पथक असणार असल्याचे डॉ. मंगरुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कोणत्याही धरणातून शेतीसाठी पाणीउपसा करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा डॉ. मंगरूळे व खैरनार यांनी दिला आहे. (वार्ताहर)