शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

सेना-भाजपात दुरंगी सामना

By admin | Updated: February 16, 2017 00:31 IST

चुरस : प्रादेशिक मुद्द्याभोवती पिंगा घालणारी निवडणूक

नितीन शिंदे  ठाणगावसह्याद्रीच्या डोंगररांगेत व सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेल्या ठाणगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या वनिता नामदेव शिंदे व भाजपाच्या शीलाबाई प्रभाकर हारक यांच्यात चुरशीची लढत होत असल्याचे चित्र आहे. दरवेळच्या निवडणुकीत असणारा प्रादेशिक वादाचा मुद्दा या निवडणुकीतही प्रकर्षाने जाणवत आहे. सिन्नरचे कोकण म्हणून ओळखला जाणारा ठाणगाव, पांढुर्ली, शिवडा हा परिसर कृषी क्षेत्रात सधन व समृद्ध आहे. तसेच येथील राजकारणही चांगलेच बहरले असल्याचे वेळोवेळी झालेल्या निवडणुकीत दिसून येते. ठाणगाव गटात अन्य पक्षांना उमेदवार मिळाला नाही त्यामुळे या निवडणुकीत पक्षापेक्षा आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून ठाणगाव गटात माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थक जिल्हा परिषद सदस्य विजयी झाला आहे. गेल्या निवडणुकीत या गटात तिरंगी लढत झाली होती. त्याचा फायदा कोकाटे समर्थक केरू पवार यांना झाला होता. त्यामुळे यावेळी मतविभागणी होऊ नये याची काळजी आमदार वाजे यांच्या गटाने घेतल्याचे दिसून येते. बाजार समितीचे माजी सभापती व ठाणगावचे सरपंच नामदेव शिंदे यांना गेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र पाच वर्षे त्यांनी गटातील जनतेसोबत संपर्क ठेवून या निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती वनिता शिंदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे, तर शिवडे येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर हारक यांच्या पत्नी शीलाबाई हारक यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. शिंदे व हारक यांच्यात दुरंगी लढत होत आहे. सह्याद्रीच्या पर्वतारांगांमुुळे हा गट घाटाखालचा व घाटावरचा अशा दोन भागात विभागला गेला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान प्रादेशिकतेचा मुद्दा डोके वर काढत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या निवडणुकीतही तोच मुद्दा पुढे येऊ पाहात आहे. ३२ हजार २५९ मतदारसंख्या असलेल्या ठाणगाव गटात ठाणगाव व शिवडे असे दोन गण आहेत. शिवसेनेने ठाणगाव गणात वेणूबाई अशोक डावरे, तर शिवडे गणात रावसाहेब म्हसुजी आढाव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने ठाणगाव गणातून मंगला बाळासाहेब शिंदे, तर शिवडे गणातून तातू भागवत जगताप यांना रिंगणात उभे केले आहे. ठाणगाव गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवार हौशाबाई मुरलीधर पवार यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीचा कोणत्या उमेदवाराला फायदा होतो, हे निवडणूक निकालानंतर कळेलच. सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात सेना-भाजपात होत असलेल्या दुरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.