शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपात दुरंगी सामना

By admin | Updated: February 16, 2017 00:31 IST

चुरस : प्रादेशिक मुद्द्याभोवती पिंगा घालणारी निवडणूक

नितीन शिंदे  ठाणगावसह्याद्रीच्या डोंगररांगेत व सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेल्या ठाणगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या वनिता नामदेव शिंदे व भाजपाच्या शीलाबाई प्रभाकर हारक यांच्यात चुरशीची लढत होत असल्याचे चित्र आहे. दरवेळच्या निवडणुकीत असणारा प्रादेशिक वादाचा मुद्दा या निवडणुकीतही प्रकर्षाने जाणवत आहे. सिन्नरचे कोकण म्हणून ओळखला जाणारा ठाणगाव, पांढुर्ली, शिवडा हा परिसर कृषी क्षेत्रात सधन व समृद्ध आहे. तसेच येथील राजकारणही चांगलेच बहरले असल्याचे वेळोवेळी झालेल्या निवडणुकीत दिसून येते. ठाणगाव गटात अन्य पक्षांना उमेदवार मिळाला नाही त्यामुळे या निवडणुकीत पक्षापेक्षा आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून ठाणगाव गटात माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थक जिल्हा परिषद सदस्य विजयी झाला आहे. गेल्या निवडणुकीत या गटात तिरंगी लढत झाली होती. त्याचा फायदा कोकाटे समर्थक केरू पवार यांना झाला होता. त्यामुळे यावेळी मतविभागणी होऊ नये याची काळजी आमदार वाजे यांच्या गटाने घेतल्याचे दिसून येते. बाजार समितीचे माजी सभापती व ठाणगावचे सरपंच नामदेव शिंदे यांना गेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र पाच वर्षे त्यांनी गटातील जनतेसोबत संपर्क ठेवून या निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती वनिता शिंदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे, तर शिवडे येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर हारक यांच्या पत्नी शीलाबाई हारक यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. शिंदे व हारक यांच्यात दुरंगी लढत होत आहे. सह्याद्रीच्या पर्वतारांगांमुुळे हा गट घाटाखालचा व घाटावरचा अशा दोन भागात विभागला गेला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान प्रादेशिकतेचा मुद्दा डोके वर काढत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या निवडणुकीतही तोच मुद्दा पुढे येऊ पाहात आहे. ३२ हजार २५९ मतदारसंख्या असलेल्या ठाणगाव गटात ठाणगाव व शिवडे असे दोन गण आहेत. शिवसेनेने ठाणगाव गणात वेणूबाई अशोक डावरे, तर शिवडे गणात रावसाहेब म्हसुजी आढाव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने ठाणगाव गणातून मंगला बाळासाहेब शिंदे, तर शिवडे गणातून तातू भागवत जगताप यांना रिंगणात उभे केले आहे. ठाणगाव गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवार हौशाबाई मुरलीधर पवार यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीचा कोणत्या उमेदवाराला फायदा होतो, हे निवडणूक निकालानंतर कळेलच. सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात सेना-भाजपात होत असलेल्या दुरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.