शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

प्रदूषणमुक्त गोदावरीशिवाय कुंभ अशक्य

By admin | Updated: January 13, 2015 23:50 IST

श्री श्री रविशंकर : लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला करोडो लोक येतील. त्यावेळी जर गोदावरी नदी अस्वच्छ राहिली तर येथून रोगराई घेऊन लोक जातील. प्रदूषणमुक्त गोदावरीशिवाय कुंभ अशक्य असून, महापालिका आणि नागरिकांनी एकत्र येऊन युद्धपातळीवर गोदावरीसह अन्य नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. महापालिकेनेही गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाणी अन्यत्र वळविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवावी, असे आवाहन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नाशिक महापालिकेने मखमलाबाद नाक्यावर सुमारे बारा कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर अशोक मुर्तडक होते. यावेळी श्री श्री रविशंकर यांनी सांगितले, सहा वर्षांपूर्वी मी नाशिकला आलो होतो. तेव्हा आणि आता खूप फरक जाणवत असला तरी खराब गोष्टी नजरेत भरतातच. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्यांची स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. हे काम सरकार अथवा महापालिका यांच्या एकट्याने होणार नाही, तर सर्व नाशिककरांनी एकत्र येऊन दर रविवारी चार तासांचा वेळ दिला, तर संपूर्ण शहर स्वच्छ होऊ शकेल. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या साधकांनी सोलापूरचा तलाव लोकसहभागातूनच स्वच्छ केला. वेळ हीच संपत्ती आहे आणि वेळ देणे म्हणजे संपत्ती देण्यासारखेच आहे. गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर सांडपाणीही मिसळले जात आहे. महापालिकेने हे सांडपाण्याचे नाले अन्यत्र वळविण्याचे काम हाती घ्यावे, असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.