शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

वीज देयके माफी, जनावरांना चारा द्या

By admin | Updated: December 19, 2015 23:04 IST

दुष्काळ पाहणी दौरा : शिष्टमंडळासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या अनेक व्यथा

सिन्नर : सलग पाच वर्षांपासून विहिरींना पाणी नसताना हजारो रुपयांची वीज देयके येतात, पाण्याचा टॅँकर वेळेवर व नियमित येत नाही, माणसांना प्यायला पाणी मिळते मात्र जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू असताना गावचा जलयुक्त शिवार योजनेत सहभाग नाही आदिंसह विविध व्यथांचा पाढा सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजाभाऊ वाजे यांच्यापुढे वाचला. दुष्काळी परिस्थितीत शासनाने वीज देयके माफ करावी व कर्जमाफीचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या दुष्काळ पाहणी पथकासमोर केली.महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, पंचायत समिती सदस्य उदय सांगळे, छावाचे विलास पांगारकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर, सायाळे व मिठसागरे या गावांचा दुष्काळ पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, नायब तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर यांच्यासह वीज वितरण, पाटबंधारे, शिक्षण, वनविभाग आदिंसह सर्वच खात्याचे अधिकारी सहभागी झाले होते. धोंडवीरनगर येथून दुष्काळ पाहणी दौऱ्यास प्रारंभ झाला. महसूल पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विचारण्यासह राज्यमंत्री राठोड यांनी ग्रामस्थांना विविध प्रश्न विचारून गावात शासकीय योजना पोहचतात की नाही, याची माहिती जाणून घेतली. यावेळी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे महिलांनी सांगितले. महसूल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून टॅँकर सुरू करण्यास दिरंगाई केली जात असल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली. जनावरेही पिणार नाही असे पाणी असलेल्या विहिरीतून पाणी घेण्याचा आग्रह केला जात असल्याची तक्रार माहिलांनी केली. अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पाणी पाहणी दौऱ्याच्या चक्रव्यूहात गावे कासावीस झाल्याची तक्रार उदय सांगळे यांनी केली. अधिकाऱ्यांनी टॅँकरचा प्रस्ताव मंजूर करताना वास्तव परिस्थितीचे भान ठेवण्याचे आवाहन सांगळे यांनी केले. त्यानंतर महसूल राज्यमंत्री राठोड यांनी तातडीने धोंडवीरनगर गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टॅँकर मंजूर करण्याचे आदेश प्रातांधिकारी मंगरुळे यांना केले. यावेळी कोनांबे पूर चारीचे रखडलेल्या कामाच्या व अपूर्ण नळपाणीपुरवठा योजनेच्या तक्रारी ग्रामस्थांनी राठोड यांच्याकडे केल्या. त्यानंतर सायाळे येथे महसूल राज्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी कोरड्याठाक व दूषित पाणी असलेल्या विहिरी दाखविल्या. नीळवंडे धरणातून प्रस्तावित असलेल्या चाऱ्यांचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने सहकार्य करण्याची मागणी विजय शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली. चार वर्षांपासून सायाळे गावास पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू असताना गावाचा समावेश जलयुक्त शिवारात का करण्यात आला नाही, असा सवाल बाजार समितीचे संचालक सुधाकर शिंदे यांनी उपस्थितीत केला. यावेळी शेतकऱ्यांनी चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली. माणसांना पाणी मिळते मात्र जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. मिठसागरे येथे सरपंच अ‍ॅड. शरद चतुर यांनी गाव व परिसरात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचला. वीज देयक माफी, जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महसूल राज्यमंत्री राठोड व आमदार वाजे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येणार असल्यामुळे गावोगावी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शेतकरी अतिशय पोटतिडकीने दुष्काळाची दाहकता मांडत होते. दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे राठोड यांनी सांगितले. सामान्य माणसाला केंद्रबिंदू करून जे करण्याजोगे आहेत ते करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे राठोड म्हणाले. चारा डेपो व टॅँकर सुरू करण्याची तयारी शासन करीत असल्याचे राठोड यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण आलो असून, पक्ष शेतकऱ्यांसोबत असल्याचे राठोड यांनी धोंडवीरनगर, सायाळे व मिठसागरे येथे सांगितले. टॅँकरने पाणीपुरवठ्याची मागणीब्राह्मणगाव : येथील गव्हाळी पांदी शिवारातील विहिरी आटल्याने पिण्याच्य पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिसरात टॅँकरने पाणीपुरवठा करावा तसेच कुपनलिका खोदावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने गव्हाळी पांदी, डोंगर परिसर, धांद्री पांदी शिवारात डिसेंबरमध्येच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. शिवारात पिण्याच्या पाण्याचे, जनावरांना पाण्याचे व चाऱ्याचे संकट घर करू लागले आहे. पाण्याअभावी शेती सोडून द्यावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी कांदा रोपे शिरपूर, धुळे तालुक्यांमध्ये लागवडीसाठी दिली आहेत. झालेली कांदा लागवड हाती येईलच याचीही खात्री देता येत नसल्याने संकटाने शेतकरी त्रस्त झाला आहे. (वार्ताहर)