शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

मनुष्यशक्तीचा अंदाज घेऊन अभ्यासक्रम राबवावा

By admin | Updated: January 22, 2015 00:55 IST

विनय सहस्त्रबुद्धे : कर्मवीर काकासाहेब वाघ चरित्रग्रंथाचे प्रकाशन

पंचवटी : शिक्षणसंस्था, महाविद्यालये, तसेच विद्यापीठाने लोकप्रतिनिधींच्या कामांचे मूल्यमापन केल्यास त्याचा समाजाला फायदाच होईल. शिक्षणसंस्था व शिक्षण प्रवाहाच्या बाबतीत कोणते प्रश्न आहेत हे लक्षात घेऊन मनुष्यशक्तीनुसार अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या सरस्वतीनगर येथील कृषी महाविद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या चरित्रगं्रथाचे प्रकाशन व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी सहस्त्रबुद्धे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी सहस्त्रबुद्धे म्हणाले की, पूर्वीच्या काळी असलेल्या समस्यांचा आज निचरा झालेला नाही. देशाने, राज्याने परिवर्तनाचा अनुभव घेतला असून, राजकीय कामातून परिवर्तन होणे गरजेचे आहे. शिक्षक, विद्यार्थी यांच्यातून मतदारांचे अभिमत निर्माण होते; मात्र आज कोणतीही संस्था मतदारांचे प्रशिक्षण करीत नाही. नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या कार्यक्षेत्रातील तफावत लक्षात आणून दिली तर प्रश्न सुटतील. ६५ वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या व्यवस्थेत विशेष बदल झालेला नाही. काळ बदलल्याने नव्या पिढीची रचना करावी लागणार आहे. लोकप्रतिनिधींना मिळालेल्या निधीचा वापर कसा होतो, अनेकांचा निधी वापरला जात नाही. त्यामुळे मतदारांना वाटते, लोकप्रतिनिधींनी कामे केली नाहीत. आमदार, लोकप्रतिनिधी व मतदारांनी सजग राहावे.व्यासपीठावर मविप्रच्या नीलिमा पवार, आमदार सीमा हिरे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल अहेर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, राजाभाऊ वाजे, कुलगुरु अरुण जामकर, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले, लक्ष्मण सावजी, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सुरेशअण्णा पाटील, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रा. राहुल पाटील, अनिल कदम आदिंसह मान्यवर उपस्थित होते. प्रा. के. एस. बंदी यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन नंदन रहाणे यांनी केले.कार्यक्रमाला निशिगंधा मोगल, माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, प्राचार्य संतोष वाघ, डॉ. एस. एम. हाडोळे, एस. पी. क्षीरसागर, डॉ. बी. व्ही. कर्डिले, पी. टी. कडवे उपस्थित होते. (वार्ताहर)