शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

दहावी, बारावी परीक्षांच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्ज स्वीकारणार : कृष्णकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांचे काय ...

नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांचे काय होणार, याविषयी निर्माण झालेली साशंकता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने संपुष्टात आली आहे. तसेच नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांची तयारीही सुरू केली आहे. या परीक्षांपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी विविध अडचणींमुळे निर्धारित वेळेत अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

प्रश्न : कोरोनाच्या संकटात दहावी, बारावीच्या परीक्षांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन?

पाटील : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार, ऑफलाइन परीक्षांचे नियोजन विभागीय शिक्षण मंडळाने सुरू केले असून याविषयी विद्यार्थी व पालकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय परीक्षेची तयारी करावी. ताणतणावविरहित परीक्षेसाठी विभागीय मंडळही प्रयत्नशील आहे.

प्रश्न : नाशिक विभागातून किती विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतील, याविषयी विभागीय मंडळाचा अंदाज काय आहे?

पाटील : नाशिक विभागातून दहावीच्या सुमारे ०००० तर बारावीच्या ००० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत विभागीय मंडळाकडून परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

प्रश्न : गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. यामागे काय कारण असू शकते?

पाटील : परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थीसंख्येत काही प्रमाणात घट दिसत असली, तरी अजूनही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत आहे. अनेक विद्यार्थी अजूनही अर्ज सादर करीत आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थी वाढण्याची शक्यता आहे. तर, कोरोनाकाळात अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली असून त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाल्याने काही प्रमाणात संख्या घटली आहे. मात्र, ही संख्या फारच कमी आहे.

प्रश्न : परीक्षेच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार आहे का?

पाटील : शासनाच्या सूचनेनुसार विभागीय मंडळाकडून परीक्षेचे नियोजन सुरू आहे. यात विद्यार्थी सुरक्षेसाठी परीक्षा केंद्र वाढविण्याची वेळ आली, तर परीक्षा केंद्रेही वाढविण्यात येतील. विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, शा‌ळेमध्ये विद्यार्थी मास्क वापरत असून परीक्षांनाही विद्यार्थी मास्क वापरतील. त्याचप्रमाणे सर्व केंद्रांवर निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी भीतीमुक्त, तणावविरहित आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा यशस्वी करण्याचा विभागीय मंडळाचा निर्धार आहे.