शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ७४ बगिच्यांची भर पडणार

By admin | Updated: May 25, 2015 01:57 IST

आणखी ७४ बगिच्यांची भर पडणार

नाशिक : शहरात आजमितीला अस्तित्वात असलेल्या साडेचारशेहून अधिक बगिच्यांमध्ये नव्या प्रारूप शहर विकास आराखड्यानुसार आणखी ७४ बगिच्यांची भर पडणार आहे. गार्डन सिटीचे स्वप्न पाहणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गोदा पार्कबरोबरच बगिच्यांसाठीही जागांवर आरक्षण टाकण्यात आले असले तरी त्यातील ६४ आरक्षणे ही खासगी जागांवर असल्याने महापालिकेला त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी बगिचे साकारण्यात आले असले तरी काही मोजके बगिचे वगळता अन्य बगीच्यांची अवस्था देखभाल-दुरुस्तीअभावी बिकट बनलेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उद्यानांच्या देखभालीचा ठेका संपुष्टात आल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याअभावी उद्यानांतील झाडे वाळून गेलेली आहेत, तर अनेक ठिकाणी उद्यानांना कोणी वाली नसल्याने कचराकुंड्यांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. शहरातील बव्हंशी उद्याने दम तोडत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकला गार्डन सिटी बनविण्याचा विडा उचलला असून, त्यासाठी वनविभागाच्या नेहरू उद्यानात सुमारे २५ हेक्टर जागेवर वनौषधी उद्यान साकारण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. याशिवाय मध्यवस्तीतील शिवाजी उद्यानही महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राला विकसित करण्यासाठी दिले जाणार आहे. शहरातील उद्यानांची स्थिती दयनीय असतानाच नव्या प्रारूप विकास आराखड्यात ७४ उद्यानांसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यातील फक्त दहा उद्यानांचे आरक्षण महापालिकेच्या मालकीच्या जागांवर आहे. मात्र, ६४ उद्यानांचे आरक्षण हे खासगी जागांवर टाकण्यात आल्याने महापालिकेला भविष्यात भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय आराखड्यात सार्वजनिक सुविधांसाठीही जागा आरक्षित करण्यात आल्याने त्यावरही बगिचे उभे राहू शकतात. त्यामुळे बगिच्यांच्या संख्येत भरच पडणार आहे. मात्र, बगिच्यांची संख्या वाढविताना त्यांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत उद्यान विभाग सपशेल अपयशी ठरलेला आहे. उद्यान विभागातील अंतर्गत वादाचा फटका उद्यानांच्या अस्तित्वावर होताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)