शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

आणखी ७४ बगिच्यांची भर पडणार

By admin | Updated: May 25, 2015 01:57 IST

आणखी ७४ बगिच्यांची भर पडणार

नाशिक : शहरात आजमितीला अस्तित्वात असलेल्या साडेचारशेहून अधिक बगिच्यांमध्ये नव्या प्रारूप शहर विकास आराखड्यानुसार आणखी ७४ बगिच्यांची भर पडणार आहे. गार्डन सिटीचे स्वप्न पाहणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गोदा पार्कबरोबरच बगिच्यांसाठीही जागांवर आरक्षण टाकण्यात आले असले तरी त्यातील ६४ आरक्षणे ही खासगी जागांवर असल्याने महापालिकेला त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी बगिचे साकारण्यात आले असले तरी काही मोजके बगिचे वगळता अन्य बगीच्यांची अवस्था देखभाल-दुरुस्तीअभावी बिकट बनलेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उद्यानांच्या देखभालीचा ठेका संपुष्टात आल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याअभावी उद्यानांतील झाडे वाळून गेलेली आहेत, तर अनेक ठिकाणी उद्यानांना कोणी वाली नसल्याने कचराकुंड्यांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. शहरातील बव्हंशी उद्याने दम तोडत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकला गार्डन सिटी बनविण्याचा विडा उचलला असून, त्यासाठी वनविभागाच्या नेहरू उद्यानात सुमारे २५ हेक्टर जागेवर वनौषधी उद्यान साकारण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. याशिवाय मध्यवस्तीतील शिवाजी उद्यानही महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राला विकसित करण्यासाठी दिले जाणार आहे. शहरातील उद्यानांची स्थिती दयनीय असतानाच नव्या प्रारूप विकास आराखड्यात ७४ उद्यानांसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यातील फक्त दहा उद्यानांचे आरक्षण महापालिकेच्या मालकीच्या जागांवर आहे. मात्र, ६४ उद्यानांचे आरक्षण हे खासगी जागांवर टाकण्यात आल्याने महापालिकेला भविष्यात भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय आराखड्यात सार्वजनिक सुविधांसाठीही जागा आरक्षित करण्यात आल्याने त्यावरही बगिचे उभे राहू शकतात. त्यामुळे बगिच्यांच्या संख्येत भरच पडणार आहे. मात्र, बगिच्यांची संख्या वाढविताना त्यांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत उद्यान विभाग सपशेल अपयशी ठरलेला आहे. उद्यान विभागातील अंतर्गत वादाचा फटका उद्यानांच्या अस्तित्वावर होताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)