शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंजनेरी-त्र्यंबक रस्ता ‘खड्ड्यात’

By admin | Updated: September 12, 2014 00:08 IST

अंजनेरी-त्र्यंबक रस्ता ‘खड्ड्यात’

नाशिक : गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंजनेरीपासून पुढे त्र्यंबकेश्वरपर्यंत मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे येथून मार्गक्रमण करताना हाल होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सुमारे सहा महिन्यांपासून नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे रुंदीकरण-डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. यामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. पावसामुळे रस्त्याच्या कामात संपूर्णत: अडथळा निर्माण होऊन काम बंद पडले आहे. परिणामी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वाढ झाली असून, सर्वत्र खड्डे व खडीचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अंजनेरीपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे एकेरी रस्त्यावरून दोन्ही बाजूने सुरू असलेली वाहतूक व पडलेले खड्डे यामुळे त्र्यंबकची वाट बिकट झाली आहे. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी पुढे मार्गस्थ होताना नागरिकांच्या नाकीनव येत आहे. कारण रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळून अपघातांमध्ये वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. धो-धो कोसळणारा पाऊस, रस्त्यावर पसरलेले खड्ड्यांचे व अंधाराचे साम्राज्य व बेशिस्तपणे होणारी वाहतूक यामुळे अंजनेरी-त्र्यंबक रस्ता अपघाताचे केंद्रबिंदू बनू पाहत आहे. अर्धवट स्थितीत रेंगाळलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या गलथान कारभारा-विरोधात संताप व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)