शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

संतप्त गावकऱ्यांनी समृद्धीचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 22:47 IST

सिन्नर : मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गामुळे वावी-कहांडळवाडी हा संगमनेर तालुक्यातील तळेगावपर्यंत जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे संतप्त ...

ठळक मुद्देअंडरपासची मागणी : चर्चेनंतर आंदोलन मागे

सिन्नर : मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गामुळे वावी-कहांडळवाडी हा संगमनेर तालुक्यातील तळेगावपर्यंत जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कहांडळवाडी येथील ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गाचे काम थांबविले. वावी-कहांडळवाडी रस्त्यावर अंडरपासची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.समृद्धीच्या सर्वेक्षणदरम्यान येथील अंडरपास वगळला जाऊन वावी-पारेगाव, वावी-देवकौठे या तुलनेने वर्दळ नसलेल्या, मात्र जिल्हा मार्ग म्हणून रेखित झालेल्या रस्त्यांवर अंडरपास देण्यात आले आहेत. हे दोन्ही अंडरपास वावी-कहांडळवाडी मार्गावरून होणाºया वाहतुकीला गैरसोयीचे आहेत. मोठा वळसा घालून सर्व्हिसरोडने ही वाहतूक होणार असल्याने कहांडळवाडी ग्रामस्थांनी आज थेट समृद्धीच्या साइटवर जाऊन सदर रस्त्यावर भर टाकण्याचे सुरू असलेले काम बंद पाडले. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता देसाई यांच्याशी संपर्क साधत ग्रामस्थांनी आपल्या भावना कळविल्या. समृद्धीच्या सर्वेक्षणावेळी रस्त्याचा दर्जा तांत्रिकदृष्ट्या रेकॉर्डवर न आल्याने येथील अंडरपास वगळला गेला असल्याची माहिती देसाई यांनी दिली. मात्र, लॉकडाउनचा कालावधी संपुष्टात आल्यावर यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीची योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देसाई यांनी दिले. सरपंच अण्णासाहेब कहांडळ, उपसरपंच पुंजाहरी कहांडळ, सदस्य श्याम कहांडळ, कांचन कोकणे, लक्ष्मीबाई अभंग, माया नाठे, कल्पना खरात यांच्यासह ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.सोशल डिस्टन्स्ािंगचा अवलंब करत परस्परांपासून सुरक्षित अंतर ठेवत ग्रामस्थांनी महामार्गाचे काम बंद करण्याची मागणी केली. वावी ठाण्यातील हवालदार नितीन जगताप, दशरथ मोरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढत जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचा अध्यादेश लागू असल्याने आंदोलन न करण्यास सांगितले. वरिष्ठ अधिकारी व ठेकेदाराचे सकारात्मक बोलणे झाल्यानंतर ग्रामस्थ या ठिकाणाहून निघून गेले.वावी-कहांडळवाडी हा रस्ता नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून फेºयादेखील सुरू आहेत. असे असताना सर्वेक्षणावेळी या रस्त्याचे महत्त्व दुर्लक्षित करण्यात आले. लॉकडाउनचा कालावधी आटोपताच आपण स्वत: रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेणार आहोत. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अंडरपास होईलच, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग