शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त गावकऱ्यांनी समृद्धीचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 22:47 IST

सिन्नर : मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गामुळे वावी-कहांडळवाडी हा संगमनेर तालुक्यातील तळेगावपर्यंत जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे संतप्त ...

ठळक मुद्देअंडरपासची मागणी : चर्चेनंतर आंदोलन मागे

सिन्नर : मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गामुळे वावी-कहांडळवाडी हा संगमनेर तालुक्यातील तळेगावपर्यंत जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कहांडळवाडी येथील ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गाचे काम थांबविले. वावी-कहांडळवाडी रस्त्यावर अंडरपासची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.समृद्धीच्या सर्वेक्षणदरम्यान येथील अंडरपास वगळला जाऊन वावी-पारेगाव, वावी-देवकौठे या तुलनेने वर्दळ नसलेल्या, मात्र जिल्हा मार्ग म्हणून रेखित झालेल्या रस्त्यांवर अंडरपास देण्यात आले आहेत. हे दोन्ही अंडरपास वावी-कहांडळवाडी मार्गावरून होणाºया वाहतुकीला गैरसोयीचे आहेत. मोठा वळसा घालून सर्व्हिसरोडने ही वाहतूक होणार असल्याने कहांडळवाडी ग्रामस्थांनी आज थेट समृद्धीच्या साइटवर जाऊन सदर रस्त्यावर भर टाकण्याचे सुरू असलेले काम बंद पाडले. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता देसाई यांच्याशी संपर्क साधत ग्रामस्थांनी आपल्या भावना कळविल्या. समृद्धीच्या सर्वेक्षणावेळी रस्त्याचा दर्जा तांत्रिकदृष्ट्या रेकॉर्डवर न आल्याने येथील अंडरपास वगळला गेला असल्याची माहिती देसाई यांनी दिली. मात्र, लॉकडाउनचा कालावधी संपुष्टात आल्यावर यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीची योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देसाई यांनी दिले. सरपंच अण्णासाहेब कहांडळ, उपसरपंच पुंजाहरी कहांडळ, सदस्य श्याम कहांडळ, कांचन कोकणे, लक्ष्मीबाई अभंग, माया नाठे, कल्पना खरात यांच्यासह ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.सोशल डिस्टन्स्ािंगचा अवलंब करत परस्परांपासून सुरक्षित अंतर ठेवत ग्रामस्थांनी महामार्गाचे काम बंद करण्याची मागणी केली. वावी ठाण्यातील हवालदार नितीन जगताप, दशरथ मोरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढत जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचा अध्यादेश लागू असल्याने आंदोलन न करण्यास सांगितले. वरिष्ठ अधिकारी व ठेकेदाराचे सकारात्मक बोलणे झाल्यानंतर ग्रामस्थ या ठिकाणाहून निघून गेले.वावी-कहांडळवाडी हा रस्ता नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून फेºयादेखील सुरू आहेत. असे असताना सर्वेक्षणावेळी या रस्त्याचे महत्त्व दुर्लक्षित करण्यात आले. लॉकडाउनचा कालावधी आटोपताच आपण स्वत: रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेणार आहोत. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अंडरपास होईलच, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग