शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

नांदगाव (संजीव धामणे) : मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा....या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ...

नांदगाव (संजीव धामणे) : मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा....या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कवितेची आठवण आल्यावाचून राहत नाही. नांदगावला मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्ध्वस्त झालेले संसार आणि पूर ओसरल्यानंतर गाळात आपल्या वस्तू शोधणारी कुटुंब. लेंडी नदीच्या किनाऱ्यावर बसून रुपयांची नाणी शोधण्यासाठी परिवाराची केविलवाणी धडपड धडपड दिसून आली.

बुधवारी शहरात हा... हा.... कार उडवून दिलेल्या शाकांबरी व लेंडी या दोन्ही नद्यांचे वस्तीत शिरलेले पुराचे पाणी एकीकडे ओसरत असताना उद्ध्वस्त संसार सावरण्यासाठी गाळात दडलेल्या वस्तू शोधण्यात आख्खे कुटुंब कामाला लागल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. शहरातील व्यवसाय सुरू झाले आहेत. पुराच्या खुणा बघणाऱ्या बघ्यांची संख्या लक्षणीय आहे. अजूनही काठावरचा कचरा, चीजवस्तू नदीच्या प्रवाहात तरंगताना दिसून येत आहेत. पुलाला अडकलेला कचरा व घाण ठिकठिकाणी दिसून येत आहे. विस्थापित झालेल्या अधिकतर लोकांनी मस्तानी अम्मा मशिदीत आश्रय घेतला आहे. त्यांच्यासाठी नगर परिषदेतर्फे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

२००९ च्या पुरानंतर प्रशासन व नागरिक दोघांनी धडा घेतला असता तर कालची परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी प्रतिक्रिया येत असून ते शिमग्यानंतरचे कवित्व असल्याचेच सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. अतिक्रमणे उठविण्यासाठी वेळोवेळी तत्कालीन मुख्याधिकारी सुधीर राऊत, अजय भदाणे तसेच तहसीलदार सुनील गाढे यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. पण उपयोग झाला नाही. त्यानंतर २००९ सालात पुराच्या तडाख्यात अतिक्रमणे हटवली. आजपर्यंतच्या अनुभवातून राजकीय नेते, प्रशासन व महत्त्वाचे म्हणजे जनता काही धडा घेणार आहे की नाही? हाच कळीचा प्रश्न आहे.(०९ नांदगाव ँकर)