शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

नांदगाव (संजीव धामणे) : मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा....या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ...

नांदगाव (संजीव धामणे) : मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा....या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कवितेची आठवण आल्यावाचून राहत नाही. नांदगावला मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्ध्वस्त झालेले संसार आणि पूर ओसरल्यानंतर गाळात आपल्या वस्तू शोधणारी कुटुंब. लेंडी नदीच्या किनाऱ्यावर बसून रुपयांची नाणी शोधण्यासाठी परिवाराची केविलवाणी धडपड धडपड दिसून आली.

बुधवारी शहरात हा... हा.... कार उडवून दिलेल्या शाकांबरी व लेंडी या दोन्ही नद्यांचे वस्तीत शिरलेले पुराचे पाणी एकीकडे ओसरत असताना उद्ध्वस्त संसार सावरण्यासाठी गाळात दडलेल्या वस्तू शोधण्यात आख्खे कुटुंब कामाला लागल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. शहरातील व्यवसाय सुरू झाले आहेत. पुराच्या खुणा बघणाऱ्या बघ्यांची संख्या लक्षणीय आहे. अजूनही काठावरचा कचरा, चीजवस्तू नदीच्या प्रवाहात तरंगताना दिसून येत आहेत. पुलाला अडकलेला कचरा व घाण ठिकठिकाणी दिसून येत आहे. विस्थापित झालेल्या अधिकतर लोकांनी मस्तानी अम्मा मशिदीत आश्रय घेतला आहे. त्यांच्यासाठी नगर परिषदेतर्फे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

२००९ च्या पुरानंतर प्रशासन व नागरिक दोघांनी धडा घेतला असता तर कालची परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी प्रतिक्रिया येत असून ते शिमग्यानंतरचे कवित्व असल्याचेच सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. अतिक्रमणे उठविण्यासाठी वेळोवेळी तत्कालीन मुख्याधिकारी सुधीर राऊत, अजय भदाणे तसेच तहसीलदार सुनील गाढे यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. पण उपयोग झाला नाही. त्यानंतर २००९ सालात पुराच्या तडाख्यात अतिक्रमणे हटवली. आजपर्यंतच्या अनुभवातून राजकीय नेते, प्रशासन व महत्त्वाचे म्हणजे जनता काही धडा घेणार आहे की नाही? हाच कळीचा प्रश्न आहे.(०९ नांदगाव ँकर)