शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवकांनी बांधली मोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST

येवला (योगेंद्र वाघ) : येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने पालिका राजकारणातील शेवटचा अध्याय आता सुरू ...

येवला

(योगेंद्र वाघ) : येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने पालिका राजकारणातील शेवटचा अध्याय आता सुरू झाला आहे. गेली साडेचार वर्षे सुखनैव सुरू असणारा पालिकेतील कारभार आता एकतर्फी व विश्‍वासात न घेता सुरू असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मोट बांधली आहे. यासाठी शहराचा विकास थांबला असून पाणीटंचाईचा मुद्दा हाती घेत जनतेच्या तक्रारींचा हवाला दिला जात आहे. सन २००३ मध्ये पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर सहा दिवसांआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी पाणीप्रश्‍नावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शहराला गत महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत होता. कमी दाबाने, दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्या. याबरोबरच पालिका कारभाराबाबतही प्रतिक्रिया उमटू लागल्या. लोकचर्चेत पालिका कारभार अन् कारभारी टीकेचे लक्ष्य ठरू लागले. पाणी प्रश्‍नावरून सुरू झालेल्या या राजकारणाचा प्रवाह पुढे अविश्‍वासाच्या दिशेने जात विकासाचा मुद्दाही हाती घेतला गेला. उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांचे नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवक एक झाले. पटणी यांना प्रभारी नगराध्यक्षपदाचे मधाचे बोट लावले गेले. बैठका सुरू झाल्या आणि नगराध्यक्ष वगळून पालिकेचा कारभारच पटणी यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या साथीने हाती घेतला. यादरम्यान, नाराजांच्या बैठका, कानगोष्टी आणि नेत्यांच्या भेटी-गाठी झाल्या. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्याशीही नाराज गटाच्या वतीने थेट संवाद साधल्या गेला. पालिका राजकारणाचा विचार केला तर कोणत्याच पक्षाला कोणत्याच पक्षाच्या सत्तेसाठी वावडे नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. नगराध्यक्ष क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून थेट जनतेतून निवडून आले आहेत. मात्र, त्यानंतर त्यांचा अध्यक्षपदाचा प्रवास हा राष्ट्रवादी-शिवसेना-अपक्ष यांच्याच बळावरच सुरू होता. छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने पालिकेला अध्यक्ष भाजपाचा असतानाही विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळालेला आहे अन् आजही मिळतो आहे.

पालिकेची कोटी-कोटींची उड्डाणे सुरू असली तरी शहरातील मूलभूत प्रश्‍न आजही कायम आहेत. सर्वसाधारण जनतेचे गटार, रस्ते, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी याबाबतच्या तक्रारी आजही कमी नाहीत. क्षीरसागर यांच्या कार्यकाळातील सरत्या साडेचार वर्षांचा विचार केला तर पालिका कारभाराबाबत नाराजी लपून राहिलेली नाही. पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतही सर्वसामान्यांच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. सुसंवादाने होते प्रगती, विसंवादाने अधोगती, असा फलक नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांचे दालनात लावलेला होता. आताच्या काळात पालिकेतच सुसंवादच नसल्याचे अधोरेखित होते. पालिकेचा कारभार, विकासकामे त्यावर खर्च होत असलेले कोट्यवधी रुपये याबाबतच्या तक्रारी वाढत असताना कामाची गरज, तातडी व गुणवत्ता हा प्रश्‍नदेखील उपस्थित होत आहे. समाजकारणातून राजकारण अन् राजकारणातून लाभ हे सूत्र आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच नगरपालिकेबाबत लोण्याचा गोळा अन् मधाचे बोट... ही लोकचर्चा झडत आहे.