शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

पाणीटंचाईविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवकांनी बांधली मोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST

येवला (योगेंद्र वाघ) : येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने पालिका राजकारणातील शेवटचा अध्याय आता सुरू ...

येवला

(योगेंद्र वाघ) : येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने पालिका राजकारणातील शेवटचा अध्याय आता सुरू झाला आहे. गेली साडेचार वर्षे सुखनैव सुरू असणारा पालिकेतील कारभार आता एकतर्फी व विश्‍वासात न घेता सुरू असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मोट बांधली आहे. यासाठी शहराचा विकास थांबला असून पाणीटंचाईचा मुद्दा हाती घेत जनतेच्या तक्रारींचा हवाला दिला जात आहे. सन २००३ मध्ये पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर सहा दिवसांआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी पाणीप्रश्‍नावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शहराला गत महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत होता. कमी दाबाने, दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्या. याबरोबरच पालिका कारभाराबाबतही प्रतिक्रिया उमटू लागल्या. लोकचर्चेत पालिका कारभार अन् कारभारी टीकेचे लक्ष्य ठरू लागले. पाणी प्रश्‍नावरून सुरू झालेल्या या राजकारणाचा प्रवाह पुढे अविश्‍वासाच्या दिशेने जात विकासाचा मुद्दाही हाती घेतला गेला. उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांचे नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवक एक झाले. पटणी यांना प्रभारी नगराध्यक्षपदाचे मधाचे बोट लावले गेले. बैठका सुरू झाल्या आणि नगराध्यक्ष वगळून पालिकेचा कारभारच पटणी यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या साथीने हाती घेतला. यादरम्यान, नाराजांच्या बैठका, कानगोष्टी आणि नेत्यांच्या भेटी-गाठी झाल्या. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्याशीही नाराज गटाच्या वतीने थेट संवाद साधल्या गेला. पालिका राजकारणाचा विचार केला तर कोणत्याच पक्षाला कोणत्याच पक्षाच्या सत्तेसाठी वावडे नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. नगराध्यक्ष क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून थेट जनतेतून निवडून आले आहेत. मात्र, त्यानंतर त्यांचा अध्यक्षपदाचा प्रवास हा राष्ट्रवादी-शिवसेना-अपक्ष यांच्याच बळावरच सुरू होता. छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने पालिकेला अध्यक्ष भाजपाचा असतानाही विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळालेला आहे अन् आजही मिळतो आहे.

पालिकेची कोटी-कोटींची उड्डाणे सुरू असली तरी शहरातील मूलभूत प्रश्‍न आजही कायम आहेत. सर्वसाधारण जनतेचे गटार, रस्ते, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी याबाबतच्या तक्रारी आजही कमी नाहीत. क्षीरसागर यांच्या कार्यकाळातील सरत्या साडेचार वर्षांचा विचार केला तर पालिका कारभाराबाबत नाराजी लपून राहिलेली नाही. पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतही सर्वसामान्यांच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. सुसंवादाने होते प्रगती, विसंवादाने अधोगती, असा फलक नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांचे दालनात लावलेला होता. आताच्या काळात पालिकेतच सुसंवादच नसल्याचे अधोरेखित होते. पालिकेचा कारभार, विकासकामे त्यावर खर्च होत असलेले कोट्यवधी रुपये याबाबतच्या तक्रारी वाढत असताना कामाची गरज, तातडी व गुणवत्ता हा प्रश्‍नदेखील उपस्थित होत आहे. समाजकारणातून राजकारण अन् राजकारणातून लाभ हे सूत्र आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच नगरपालिकेबाबत लोण्याचा गोळा अन् मधाचे बोट... ही लोकचर्चा झडत आहे.