शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय’ प्रकाशभारनियमनाने वाढली पुन्हा अस्वस्थता

By admin | Updated: May 23, 2017 16:25 IST

राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन

नाशिक : राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून देणाऱ्या अक्षय प्रकाश योजनेचे स्मरण होत असून, काही ठिकाणी तर आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे या योजनेची पुनर्रुज्जीवनाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात वारंवार वीज समस्येला जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर २००५ मध्ये आधी अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर जवळ जऊळके कडलग या गावात आणि नंतर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही योजना राबविण्यात आली. त्यानंतर ती राज्यभर पसरत असतानाच महावितरणने ती तात्पुरती स्थगित करण्याच्या नावाखाली बंद पाडली. वास्तविक या योजनेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च महावितरणला सोसावा लागत नव्हता. साधारणत: सकाळी आणि सायंकाळी सहा ते दहा यावेळात विजेची मागणी अधिक असते आणि त्याच वेळेत अधिक वीज खेचणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रीक शेगड्या, पाणी तापवण्याच्या क्वाइल्स अशाप्रकारची साधने वापरली जातात. विजेचा भार वाढल्याने रोहित्र बिघडते आणि घरगुती विजेची उपकरणेदेखील निकामी ठरतात. त्यापार्श्वभूमीवर ग्रामस्थांना एकत्र आणून आणि विश्वासात घेऊन योजना राबविण्यात आली. अति मागणीच्या वेळी जादा वीज खेचणारी म्हणजेच थ्रीफेज लागणारी उपकरणे वापरायची नाही. मुळात अक्षय प्रकाश योजना राबविण्याची सुरुवातच विजेच्या शेगड्या आणि क्वाईल जमा करण्यापासून होते. त्यानुसार योजना राबविताना ग्रामस्थांचे पथक तयार करून त्याला अधिकार दिले जातात. जी व्यक्ती जादा वीज खेचणाऱ्या साधनांचा वापर करेल किंवा आकडा टाकून वीज चोरेल त्याला आर्थिक दंड करून ती रक्कम गावाच्या कामासाठी वापरण्याचे अधिकारही देण्यात येतात. या माध्यमातून केवळ नाशिक जिल्ह्यातच दोन लाख विजेची उपकरणे नागरिकांनी काढून फेकली होती आणि वीज भारनियमनामुळे त्रस्त होऊन वीज केंद्रांवर आंदोलन आणि हल्ला करणारेच योजनेचे पुढे समर्थक बनले. नाशिक आणि नगरसह राज्यात सुमारे साडेसहा हजार गावांमध्ये अक्षय प्रकाशने ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून दिली होती.