शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

अक्षय’ प्रकाशभारनियमनाने वाढली पुन्हा अस्वस्थता

By admin | Updated: May 23, 2017 16:25 IST

राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन

नाशिक : राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून देणाऱ्या अक्षय प्रकाश योजनेचे स्मरण होत असून, काही ठिकाणी तर आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे या योजनेची पुनर्रुज्जीवनाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात वारंवार वीज समस्येला जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर २००५ मध्ये आधी अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर जवळ जऊळके कडलग या गावात आणि नंतर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही योजना राबविण्यात आली. त्यानंतर ती राज्यभर पसरत असतानाच महावितरणने ती तात्पुरती स्थगित करण्याच्या नावाखाली बंद पाडली. वास्तविक या योजनेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च महावितरणला सोसावा लागत नव्हता. साधारणत: सकाळी आणि सायंकाळी सहा ते दहा यावेळात विजेची मागणी अधिक असते आणि त्याच वेळेत अधिक वीज खेचणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रीक शेगड्या, पाणी तापवण्याच्या क्वाइल्स अशाप्रकारची साधने वापरली जातात. विजेचा भार वाढल्याने रोहित्र बिघडते आणि घरगुती विजेची उपकरणेदेखील निकामी ठरतात. त्यापार्श्वभूमीवर ग्रामस्थांना एकत्र आणून आणि विश्वासात घेऊन योजना राबविण्यात आली. अति मागणीच्या वेळी जादा वीज खेचणारी म्हणजेच थ्रीफेज लागणारी उपकरणे वापरायची नाही. मुळात अक्षय प्रकाश योजना राबविण्याची सुरुवातच विजेच्या शेगड्या आणि क्वाईल जमा करण्यापासून होते. त्यानुसार योजना राबविताना ग्रामस्थांचे पथक तयार करून त्याला अधिकार दिले जातात. जी व्यक्ती जादा वीज खेचणाऱ्या साधनांचा वापर करेल किंवा आकडा टाकून वीज चोरेल त्याला आर्थिक दंड करून ती रक्कम गावाच्या कामासाठी वापरण्याचे अधिकारही देण्यात येतात. या माध्यमातून केवळ नाशिक जिल्ह्यातच दोन लाख विजेची उपकरणे नागरिकांनी काढून फेकली होती आणि वीज भारनियमनामुळे त्रस्त होऊन वीज केंद्रांवर आंदोलन आणि हल्ला करणारेच योजनेचे पुढे समर्थक बनले. नाशिक आणि नगरसह राज्यात सुमारे साडेसहा हजार गावांमध्ये अक्षय प्रकाशने ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून दिली होती.