शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

अक्षय’ प्रकाशभारनियमनाने वाढली पुन्हा अस्वस्थता

By admin | Updated: May 23, 2017 16:25 IST

राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन

नाशिक : राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून देणाऱ्या अक्षय प्रकाश योजनेचे स्मरण होत असून, काही ठिकाणी तर आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे या योजनेची पुनर्रुज्जीवनाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात वारंवार वीज समस्येला जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर २००५ मध्ये आधी अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर जवळ जऊळके कडलग या गावात आणि नंतर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही योजना राबविण्यात आली. त्यानंतर ती राज्यभर पसरत असतानाच महावितरणने ती तात्पुरती स्थगित करण्याच्या नावाखाली बंद पाडली. वास्तविक या योजनेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च महावितरणला सोसावा लागत नव्हता. साधारणत: सकाळी आणि सायंकाळी सहा ते दहा यावेळात विजेची मागणी अधिक असते आणि त्याच वेळेत अधिक वीज खेचणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रीक शेगड्या, पाणी तापवण्याच्या क्वाइल्स अशाप्रकारची साधने वापरली जातात. विजेचा भार वाढल्याने रोहित्र बिघडते आणि घरगुती विजेची उपकरणेदेखील निकामी ठरतात. त्यापार्श्वभूमीवर ग्रामस्थांना एकत्र आणून आणि विश्वासात घेऊन योजना राबविण्यात आली. अति मागणीच्या वेळी जादा वीज खेचणारी म्हणजेच थ्रीफेज लागणारी उपकरणे वापरायची नाही. मुळात अक्षय प्रकाश योजना राबविण्याची सुरुवातच विजेच्या शेगड्या आणि क्वाईल जमा करण्यापासून होते. त्यानुसार योजना राबविताना ग्रामस्थांचे पथक तयार करून त्याला अधिकार दिले जातात. जी व्यक्ती जादा वीज खेचणाऱ्या साधनांचा वापर करेल किंवा आकडा टाकून वीज चोरेल त्याला आर्थिक दंड करून ती रक्कम गावाच्या कामासाठी वापरण्याचे अधिकारही देण्यात येतात. या माध्यमातून केवळ नाशिक जिल्ह्यातच दोन लाख विजेची उपकरणे नागरिकांनी काढून फेकली होती आणि वीज भारनियमनामुळे त्रस्त होऊन वीज केंद्रांवर आंदोलन आणि हल्ला करणारेच योजनेचे पुढे समर्थक बनले. नाशिक आणि नगरसह राज्यात सुमारे साडेसहा हजार गावांमध्ये अक्षय प्रकाशने ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून दिली होती.