शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वीज प्रश्नावर अजित पवार चिंतेत

By admin | Updated: July 1, 2014 00:42 IST

नाशिक : पावसाने दिलेली ओढ व त्यात विजेची वाढलेली मागणी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. धरणातील पाणी थांबविल्यामुळे कोयना, दाभोळ तर कोळशाच्या तुटवड्यामुळे पारस, भुसावळ व परळीचे संच बंद पडण्याची वेळ आल्याने सेंट्रल ग्रीड किंवा खासगी वीजनिर्मिती कंेद्रांकडून वीज खरेदी करण्याचा पर्याय त्यांनी बोलून दाखविला आहे.

नाशिक : पावसाने दिलेली ओढ व त्यात विजेची वाढलेली मागणी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. धरणातील पाणी थांबविल्यामुळे कोयना, दाभोळ तर कोळशाच्या तुटवड्यामुळे पारस, भुसावळ व परळीचे संच बंद पडण्याची वेळ आल्याने सेंट्रल ग्रीड किंवा खासगी वीजनिर्मिती कंेद्रांकडून वीज खरेदी करण्याचा पर्याय त्यांनी बोलून दाखविला आहे. नाशिक येथे विविध कार्यक्रमांनिमित्त आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी बोलताना विजेची सध्याची स्थिती कथन केली. कोयना धरणातील पाणी कमी झाल्याने वीज निर्मितीसाठी पाणी थांबविण्यात आल्याने कोयनेतील वीज उत्पादन बंद करण्यात आले, तर दाभोळ प्रकल्पही बंद पडला आहे. परळी केंद्रासाठी पुरेसा कोळसा नसल्याने त्याचे दोन संच बंद पडले आहेत. पारस, भुसावळ केंद्रांची अवस्थाही तशीच असून, एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी १४ दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात विजेचे संकट उभे राहील. त्यासाठी पुरेसा कोळसा राज्याला मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. इतर राज्यांना ज्या प्रमाणात कोळसा मिळतो, त्या प्रमाणात महाराष्ट्राला मिळावा म्हणून केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्याशीही संपर्क करण्यात आला आहे. राज्य सरकार सर्वतोपरि प्रयत्न करीत असून, प्रसंगी सेंट्रल ग्रीडमधून वीज घेण्यात येईल किंवा खासगी कंपन्यांकडूनही वीज खरेदी करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. आगामी रमजान महिना, पंढरपूरची वारी लक्षात घेता, वीज व पाण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. मध्यंतरी वादळामुळे अनेक टॉवर्स, विजेचे खांब उद्ध्वस्त झाल्याने वीजपुरवठ्यात अडचणी आल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.