शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक व्यवसायही संकटात!

By admin | Updated: May 15, 2017 22:32 IST

सिन्नर : अवकाळी पाऊस व गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुुरु असलेली दुष्काळाची मालिका यामुळे येथील शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाल्याने शेतीपूरक व्यवसाय संकटात सापडले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात नको तेव्हा येणारा अवकाळी पाऊस व गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुुरु असलेली दुष्काळाची मालिका यामुळे येथील शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाल्याने शेतीपूरक व्यवसाय संकटात सापडले आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पाच-सहा वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी, पंचाळे, देवपूर, वावी, मीठसागरे, शहा, धनगरवाडी, शिंदेवाडी, वडांगळी, खडांगळी, मेंढी, सोमठाणे, उजनी, दहिवाडी, सांगवी, पुतळेवाडी, विघनवाडी, निमगाव सिन्नर, गुळवंच, दक्षिणेकडील मऱ्हळ, निऱ्हाळे, खंबाळे, दोडी, नांदूरशिंगोटे, भोकणी, खोपडी आदी भागात टंचाईची झळ अधिक प्रमाणात आहे. गेल्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी शेतमालास भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणी आहे. गेल्या पाच वर्षांत जिरायती भागात शेती तोट्यात गेल्याने बळीराजा चिंतातुर आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही त्याचा फारसा फायदा झाला नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. मध्यंतरी तालुक्यात अवकाळी पाऊस व वाऱ्यासह गारपीट झाली. त्यात द्राक्ष व डाळींबबागांचे नुकसान झाले, तर भाजीपाला आणि चाऱ्याची पिके वाया गेली होती. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी, सर्वसामान्यांसह मजूरही हवालदिल झाले आहेत. पिण्याचे पाणी, मजुरांना रोजगार, जनावरांना चारा आदी समस्या भेडसावत आहे. पूर्व भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित केवळ खरीप पिकांच्या उत्पन्नावरच अवलंबून आहे. शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आल्याने व अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागल्याचे चित्र होते. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी जोडधंदा म्हणून दूध, कुक्कुटपालन आदी व्यवसाय निवडले आहे. मात्र त्यासाठीचा मुख्य व्यवसायच अडचणीत आल्यावर पाणी आणि चाराटंचाईने हे दोन्हीही व्यवसाय सध्या डबघाईस आल्याचे शेतकरी सांगत आहेत. जनावरांना ओला चारा बागायती भागातून घेऊन यावा लागतो. निफाड, कोपरगाव व सिन्नरच्या पूर्वेकडील काही बागायती क्षेत्रातून गुरांना चारा म्हणून ऊस विकत घ्यावा लागतो आहे. कुक्कुटपालकांना पक्ष्यांंना पिण्यासाठी टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. उन्हाळ्यात माणसांना टॅँकरने पाणी मिळते मात्र जनावरांना पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहतो. यावर्षी उन्हाळ कांद्याला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळूनही आर्थिक अडचण सहन करावी लागत आहे. शेतीपूरक व्यवसाय संकटात आल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.