शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

शेतीपूरक व्यवसायही संकटात!

By admin | Updated: May 15, 2017 22:32 IST

सिन्नर : अवकाळी पाऊस व गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुुरु असलेली दुष्काळाची मालिका यामुळे येथील शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाल्याने शेतीपूरक व्यवसाय संकटात सापडले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात नको तेव्हा येणारा अवकाळी पाऊस व गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुुरु असलेली दुष्काळाची मालिका यामुळे येथील शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाल्याने शेतीपूरक व्यवसाय संकटात सापडले आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पाच-सहा वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी, पंचाळे, देवपूर, वावी, मीठसागरे, शहा, धनगरवाडी, शिंदेवाडी, वडांगळी, खडांगळी, मेंढी, सोमठाणे, उजनी, दहिवाडी, सांगवी, पुतळेवाडी, विघनवाडी, निमगाव सिन्नर, गुळवंच, दक्षिणेकडील मऱ्हळ, निऱ्हाळे, खंबाळे, दोडी, नांदूरशिंगोटे, भोकणी, खोपडी आदी भागात टंचाईची झळ अधिक प्रमाणात आहे. गेल्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी शेतमालास भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणी आहे. गेल्या पाच वर्षांत जिरायती भागात शेती तोट्यात गेल्याने बळीराजा चिंतातुर आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही त्याचा फारसा फायदा झाला नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. मध्यंतरी तालुक्यात अवकाळी पाऊस व वाऱ्यासह गारपीट झाली. त्यात द्राक्ष व डाळींबबागांचे नुकसान झाले, तर भाजीपाला आणि चाऱ्याची पिके वाया गेली होती. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी, सर्वसामान्यांसह मजूरही हवालदिल झाले आहेत. पिण्याचे पाणी, मजुरांना रोजगार, जनावरांना चारा आदी समस्या भेडसावत आहे. पूर्व भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित केवळ खरीप पिकांच्या उत्पन्नावरच अवलंबून आहे. शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आल्याने व अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागल्याचे चित्र होते. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी जोडधंदा म्हणून दूध, कुक्कुटपालन आदी व्यवसाय निवडले आहे. मात्र त्यासाठीचा मुख्य व्यवसायच अडचणीत आल्यावर पाणी आणि चाराटंचाईने हे दोन्हीही व्यवसाय सध्या डबघाईस आल्याचे शेतकरी सांगत आहेत. जनावरांना ओला चारा बागायती भागातून घेऊन यावा लागतो. निफाड, कोपरगाव व सिन्नरच्या पूर्वेकडील काही बागायती क्षेत्रातून गुरांना चारा म्हणून ऊस विकत घ्यावा लागतो आहे. कुक्कुटपालकांना पक्ष्यांंना पिण्यासाठी टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. उन्हाळ्यात माणसांना टॅँकरने पाणी मिळते मात्र जनावरांना पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहतो. यावर्षी उन्हाळ कांद्याला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळूनही आर्थिक अडचण सहन करावी लागत आहे. शेतीपूरक व्यवसाय संकटात आल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.