शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा सायखेडा गावात बस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:17 IST

सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आतुरतेने वाट पाहावी लागत असलेली बस अखेर गावात दाखल झाली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्दे सायखेडा गावात बस दाखलएक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा

सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आतुरतेने वाट पाहावी लागत असलेली बस अखेर गावात दाखल झाली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले.पस्तीस-चाळीस गावांचे केंद्रस्थान असलेल्या सायखेडा येथे कांदा मार्केट, बाजारपेठेचे ठिकाण तसेच इतर अनेक उद्योगधंदे असून, या ठिकाणी नेहमीच आजूबाजूच्या गावातील लोकांची वर्दळ असते. गतवर्षी गोदावरीला आलेल्या पुरामुळे सायखेडा येथील जीर्ण झालेल्या पुलावरून बस वाहतूक बंद करण्यात आली होती. यात प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सायखेडा बसस्थानकाला बसचे मुखदर्शन झाल्याने प्रवासी वर्ग सुखावला आहे.येथून उच्च शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी नाशिक किंवा इतरत्र जाणारे-येणारे प्रवासी, विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नाशिक-सायखेडा बस पुलावरून लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी जोर धरून होती. बसचे दर्शन झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. सायखेडा बसस्थानकात बस दाखल होताच चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जगन्नाथ कुटे, शिवनाथ कडभाने, सुनील कुटे, माणिक कुटे, अक्षय कुटे, महेश कुटे, भगवान कुटे, राहुल सांगळे, सागर कुटे, मनोज भुतडा, जितेंद्र रिपोटे, मदन बिरे, आदेश सानप, बाळासाहेब मुरकुटे, अमोल सानप आदींसह विद्यार्थी, प्रवासी, ग्रामस्थ उपस्थित होते.तीन वर्षांपूर्वी पायाभरणीबसस्थानकाच्या पायाभरणीचा शुभारंभ तीन-चार वर्षांपूर्वी झाला. नवीन बसस्थानक उभे राहते ना राहते तोच गतवर्षी महाड येथील दुर्घटनेनंतर जागे झालेल्या बांधकाम विभागाने सायखेडा गोदापात्राच्या जीर्ण झालेल्या पुलावरून बस वाहतुकीला बंदी घातली. त्यामुळे बºयाच कालावधीनंतर लाखो रु पये खर्च करून उभारण्यात आलेल्या नवीन बसस्थानकापर्यंत तब्बल वर्षभर बस फिरकली नसल्याने कधी स्थानकासाठी, तर कधी बससाठीची प्रतीक्षा करावी लागल्याने यात प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली होती.