शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा सायखेडा गावात बस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:17 IST

सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आतुरतेने वाट पाहावी लागत असलेली बस अखेर गावात दाखल झाली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्दे सायखेडा गावात बस दाखलएक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा

सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आतुरतेने वाट पाहावी लागत असलेली बस अखेर गावात दाखल झाली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले.पस्तीस-चाळीस गावांचे केंद्रस्थान असलेल्या सायखेडा येथे कांदा मार्केट, बाजारपेठेचे ठिकाण तसेच इतर अनेक उद्योगधंदे असून, या ठिकाणी नेहमीच आजूबाजूच्या गावातील लोकांची वर्दळ असते. गतवर्षी गोदावरीला आलेल्या पुरामुळे सायखेडा येथील जीर्ण झालेल्या पुलावरून बस वाहतूक बंद करण्यात आली होती. यात प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सायखेडा बसस्थानकाला बसचे मुखदर्शन झाल्याने प्रवासी वर्ग सुखावला आहे.येथून उच्च शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी नाशिक किंवा इतरत्र जाणारे-येणारे प्रवासी, विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नाशिक-सायखेडा बस पुलावरून लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी जोर धरून होती. बसचे दर्शन झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. सायखेडा बसस्थानकात बस दाखल होताच चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जगन्नाथ कुटे, शिवनाथ कडभाने, सुनील कुटे, माणिक कुटे, अक्षय कुटे, महेश कुटे, भगवान कुटे, राहुल सांगळे, सागर कुटे, मनोज भुतडा, जितेंद्र रिपोटे, मदन बिरे, आदेश सानप, बाळासाहेब मुरकुटे, अमोल सानप आदींसह विद्यार्थी, प्रवासी, ग्रामस्थ उपस्थित होते.तीन वर्षांपूर्वी पायाभरणीबसस्थानकाच्या पायाभरणीचा शुभारंभ तीन-चार वर्षांपूर्वी झाला. नवीन बसस्थानक उभे राहते ना राहते तोच गतवर्षी महाड येथील दुर्घटनेनंतर जागे झालेल्या बांधकाम विभागाने सायखेडा गोदापात्राच्या जीर्ण झालेल्या पुलावरून बस वाहतुकीला बंदी घातली. त्यामुळे बºयाच कालावधीनंतर लाखो रु पये खर्च करून उभारण्यात आलेल्या नवीन बसस्थानकापर्यंत तब्बल वर्षभर बस फिरकली नसल्याने कधी स्थानकासाठी, तर कधी बससाठीची प्रतीक्षा करावी लागल्याने यात प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली होती.