शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

दुबार नावांचे वादळ उठल्यानंतर प्रशासनाला उपरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:19 IST

नाशिक : मतदारयादीतील गंभीर बाब शिवसेना नेत्यांनी निदर्शनास आणून देतानाच थेट राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाला आता ...

नाशिक : मतदारयादीतील गंभीर बाब शिवसेना नेत्यांनी निदर्शनास आणून देतानाच थेट राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाला आता उपरती झाली आहे. अंदाजपत्रकीय समिती नाशिकमध्ये असतानाच जिल्हा प्रशासनाने मतदार यादी शुद्धिकरण मोहिमेची दाखविलेली तत्परता केवळ कर्तव्यपूर्तीची मलमपट्टी की यादी शुद्धिकरणाची तळमळ याविषयीची शंका उपस्थित होऊ लागली आहे.

शुद्ध मतदारयादी असावी हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानले जाते. त्या दृष्टीनेच निवडणूक आयोगाकडून सर्व प्रकारची सज्जता केली जाते. असे असतानाही नाशिकमधील मतदार यादीमध्ये अडीच ते तीन लाख इतक्या मोठ्या संख्येने दुबार नावे आढळणे याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. शिवसेनेने यादीतील गोंधळ जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतानाच थेट राज्य निवडणूक आयोगालाच पुरावे सादर केल्यामुळे निवडणूक शाखेच्या कामकाजाची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त जिल्हा प्रशासनाला थेट नोटीस बजाविण्याच्या तयारीत असल्यामुळे महसूल विभागात अधिकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन मतदारयादी शुद्धिकरणाची मेाहीम राबवू पाहत आहे.

मतदार यादी शुद्ध व अद्ययावत असणे आवश्यक असल्याने मतदार यादी शुद्धिकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.

या अनुषंगाने नागरिकांनी दुबार नावे कमी करण्यासाठी मतदार यादी शुद्धिकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जनतेला केले आहे. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक दुबार नावे सुरू ठेवली असल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा व्यक्तींविरोधात निवडणूक कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मोठ्या औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, उद्योग व बांधकाम क्षेत्र यांसारख्या ठिकाणी एकाच छत्राखाली अनेक नागरिक कार्यरत असल्याने अशा आस्थापना चालकांनी आपल्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची मतदार यादीत दुबार नावनोंदणी झालेली नाही याबाबत खतरजमा करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. मतदार यादीतील दुबार नावनोंदीच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी तालुकास्तरावर व तहसील कार्यालयात कार्यवाही करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे. यादीत झालेल्या चुकांची दुरुस्ती आणि पुन्हा चुका होऊ नयेत यासाठी आटापिटा सुरू केला आहे. त्यासाठीचे नियोजनही करण्यात आलेले आहे. मात्र इतक्या मोठ्या संख्येने नावे काढणे, त्याची पडताळणी करणे यास किती कालावधी लागेल हे सांगणेही कठीण असून जिल्हा प्रशासनाला या कामावरच अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.