शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

दुबार नावांचे वादळ उठल्यानंतर प्रशासनाला उपरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:19 IST

नाशिक : मतदारयादीतील गंभीर बाब शिवसेना नेत्यांनी निदर्शनास आणून देतानाच थेट राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाला आता ...

नाशिक : मतदारयादीतील गंभीर बाब शिवसेना नेत्यांनी निदर्शनास आणून देतानाच थेट राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाला आता उपरती झाली आहे. अंदाजपत्रकीय समिती नाशिकमध्ये असतानाच जिल्हा प्रशासनाने मतदार यादी शुद्धिकरण मोहिमेची दाखविलेली तत्परता केवळ कर्तव्यपूर्तीची मलमपट्टी की यादी शुद्धिकरणाची तळमळ याविषयीची शंका उपस्थित होऊ लागली आहे.

शुद्ध मतदारयादी असावी हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानले जाते. त्या दृष्टीनेच निवडणूक आयोगाकडून सर्व प्रकारची सज्जता केली जाते. असे असतानाही नाशिकमधील मतदार यादीमध्ये अडीच ते तीन लाख इतक्या मोठ्या संख्येने दुबार नावे आढळणे याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. शिवसेनेने यादीतील गोंधळ जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतानाच थेट राज्य निवडणूक आयोगालाच पुरावे सादर केल्यामुळे निवडणूक शाखेच्या कामकाजाची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त जिल्हा प्रशासनाला थेट नोटीस बजाविण्याच्या तयारीत असल्यामुळे महसूल विभागात अधिकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन मतदारयादी शुद्धिकरणाची मेाहीम राबवू पाहत आहे.

मतदार यादी शुद्ध व अद्ययावत असणे आवश्यक असल्याने मतदार यादी शुद्धिकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.

या अनुषंगाने नागरिकांनी दुबार नावे कमी करण्यासाठी मतदार यादी शुद्धिकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जनतेला केले आहे. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक दुबार नावे सुरू ठेवली असल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा व्यक्तींविरोधात निवडणूक कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मोठ्या औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, उद्योग व बांधकाम क्षेत्र यांसारख्या ठिकाणी एकाच छत्राखाली अनेक नागरिक कार्यरत असल्याने अशा आस्थापना चालकांनी आपल्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची मतदार यादीत दुबार नावनोंदणी झालेली नाही याबाबत खतरजमा करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. मतदार यादीतील दुबार नावनोंदीच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी तालुकास्तरावर व तहसील कार्यालयात कार्यवाही करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे. यादीत झालेल्या चुकांची दुरुस्ती आणि पुन्हा चुका होऊ नयेत यासाठी आटापिटा सुरू केला आहे. त्यासाठीचे नियोजनही करण्यात आलेले आहे. मात्र इतक्या मोठ्या संख्येने नावे काढणे, त्याची पडताळणी करणे यास किती कालावधी लागेल हे सांगणेही कठीण असून जिल्हा प्रशासनाला या कामावरच अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.