शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
7
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
8
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
9
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
10
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
11
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
12
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
13
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
14
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
15
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
16
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
17
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
18
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
19
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
20
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले

कोरोनानंतर कला, साहित्य पुन्हा बहरेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त ‘संवाद’ कार्यक्रमात नाशिकच्या कला, साहित्य क्षेत्राशी निगडित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद ...

नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त ‘संवाद’ कार्यक्रमात नाशिकच्या कला, साहित्य क्षेत्राशी निगडित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सावानाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष संजय करंजकर, सहायक सचिव शंकर बोऱ्हाडे, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, नाट्यलेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक सचिन शिंदे, चित्रपट महामंडळाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष शाम लोंढे, रवी जन्नावार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कोरोनामुळे साहित्य संमेलन लांबणीवर पडले असले तरी ते नक्की होणार असून कोरोना कमी झाल्यानंतर केवळ एक महिनाभराच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करून संमेलन आयोजित केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नाट्यक्षेत्राला अजून पुढील वर्षापर्यंत फटका कायम राहणार असल्याने अजूनही काळ माध्यमांना नाट्यक्षेत्राशी निगडित बाबींना सर्व माध्यमांना मदतीचा हात पुढे करावा लागणार आहे. मात्र, वर्ष-दीड वर्षांनंतर मराठी माणूस हळूहळू नाट्यक्षेत्राकडे पुन्हा निश्चितपणे वळेल, असा विश्वासदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला तर मालिका चित्रीकरणाच्या निमित्ताने कोरोना काळात नाशिकला अनेक नाट्यनिर्माते येऊन गेल्याने भविष्यात नाशिकमध्ये मालिका आणि चित्रपट चित्रीकरणांना अधिक वेग येईल. त्यामुळे नाशिकला चित्रपट चित्रीकरणासाठी कोरोना ही इष्टापत्ती ठरल्याचे मतदेखील व्यक्त करण्यात आले तर कोरोना काळात एकूणच समाजातील माणुसकी कमी झाली नसून ती काहीशी स्वजनांच्या सुरक्षेच्या पेचात अडकली आहे. मात्र, कला माध्यमांतून त्यातील विविध पदर उलगडले जातील, असा सूरदेखील यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. तत्पूर्वी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

इन्फो

अभिव्यक्ती होईल विविध माध्यमांतून

कोरोनाच्या काळात अभिव्यक्त होण्यासाठी केवळ समाजमाध्यमे उपलब्ध असल्याने त्यातूनच सर्व व्यक्ती, कलाकार अभिव्यक्त झाले. मात्र, नजिकच्या भविष्यात कोरोना विषयाला केंद्रस्थानी ठेवून नाटक, कादंबरी आल्यासदेखील आश्चर्य वाटू नये. महामारीमुळे कला काही काळ थबकू शकतात. मात्र, काही कालावधीच्या मंथनानंतर त्यातून निश्चितच नवनीत निर्माण होईल, असा सूरदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला.