शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
4
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
5
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
6
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
7
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
8
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
9
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
10
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
11
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
12
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
13
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
14
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
15
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
16
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
17
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
18
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
19
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
20
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर कला, साहित्य पुन्हा बहरेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त ‘संवाद’ कार्यक्रमात नाशिकच्या कला, साहित्य क्षेत्राशी निगडित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद ...

नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त ‘संवाद’ कार्यक्रमात नाशिकच्या कला, साहित्य क्षेत्राशी निगडित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सावानाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष संजय करंजकर, सहायक सचिव शंकर बोऱ्हाडे, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, नाट्यलेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक सचिन शिंदे, चित्रपट महामंडळाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष शाम लोंढे, रवी जन्नावार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कोरोनामुळे साहित्य संमेलन लांबणीवर पडले असले तरी ते नक्की होणार असून कोरोना कमी झाल्यानंतर केवळ एक महिनाभराच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करून संमेलन आयोजित केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नाट्यक्षेत्राला अजून पुढील वर्षापर्यंत फटका कायम राहणार असल्याने अजूनही काळ माध्यमांना नाट्यक्षेत्राशी निगडित बाबींना सर्व माध्यमांना मदतीचा हात पुढे करावा लागणार आहे. मात्र, वर्ष-दीड वर्षांनंतर मराठी माणूस हळूहळू नाट्यक्षेत्राकडे पुन्हा निश्चितपणे वळेल, असा विश्वासदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला तर मालिका चित्रीकरणाच्या निमित्ताने कोरोना काळात नाशिकला अनेक नाट्यनिर्माते येऊन गेल्याने भविष्यात नाशिकमध्ये मालिका आणि चित्रपट चित्रीकरणांना अधिक वेग येईल. त्यामुळे नाशिकला चित्रपट चित्रीकरणासाठी कोरोना ही इष्टापत्ती ठरल्याचे मतदेखील व्यक्त करण्यात आले तर कोरोना काळात एकूणच समाजातील माणुसकी कमी झाली नसून ती काहीशी स्वजनांच्या सुरक्षेच्या पेचात अडकली आहे. मात्र, कला माध्यमांतून त्यातील विविध पदर उलगडले जातील, असा सूरदेखील यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. तत्पूर्वी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

इन्फो

अभिव्यक्ती होईल विविध माध्यमांतून

कोरोनाच्या काळात अभिव्यक्त होण्यासाठी केवळ समाजमाध्यमे उपलब्ध असल्याने त्यातूनच सर्व व्यक्ती, कलाकार अभिव्यक्त झाले. मात्र, नजिकच्या भविष्यात कोरोना विषयाला केंद्रस्थानी ठेवून नाटक, कादंबरी आल्यासदेखील आश्चर्य वाटू नये. महामारीमुळे कला काही काळ थबकू शकतात. मात्र, काही कालावधीच्या मंथनानंतर त्यातून निश्चितच नवनीत निर्माण होईल, असा सूरदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला.