शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर कला, साहित्य पुन्हा बहरेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त ‘संवाद’ कार्यक्रमात नाशिकच्या कला, साहित्य क्षेत्राशी निगडित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद ...

नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त ‘संवाद’ कार्यक्रमात नाशिकच्या कला, साहित्य क्षेत्राशी निगडित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सावानाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष संजय करंजकर, सहायक सचिव शंकर बोऱ्हाडे, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, नाट्यलेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक सचिन शिंदे, चित्रपट महामंडळाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष शाम लोंढे, रवी जन्नावार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कोरोनामुळे साहित्य संमेलन लांबणीवर पडले असले तरी ते नक्की होणार असून कोरोना कमी झाल्यानंतर केवळ एक महिनाभराच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करून संमेलन आयोजित केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नाट्यक्षेत्राला अजून पुढील वर्षापर्यंत फटका कायम राहणार असल्याने अजूनही काळ माध्यमांना नाट्यक्षेत्राशी निगडित बाबींना सर्व माध्यमांना मदतीचा हात पुढे करावा लागणार आहे. मात्र, वर्ष-दीड वर्षांनंतर मराठी माणूस हळूहळू नाट्यक्षेत्राकडे पुन्हा निश्चितपणे वळेल, असा विश्वासदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला तर मालिका चित्रीकरणाच्या निमित्ताने कोरोना काळात नाशिकला अनेक नाट्यनिर्माते येऊन गेल्याने भविष्यात नाशिकमध्ये मालिका आणि चित्रपट चित्रीकरणांना अधिक वेग येईल. त्यामुळे नाशिकला चित्रपट चित्रीकरणासाठी कोरोना ही इष्टापत्ती ठरल्याचे मतदेखील व्यक्त करण्यात आले तर कोरोना काळात एकूणच समाजातील माणुसकी कमी झाली नसून ती काहीशी स्वजनांच्या सुरक्षेच्या पेचात अडकली आहे. मात्र, कला माध्यमांतून त्यातील विविध पदर उलगडले जातील, असा सूरदेखील यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. तत्पूर्वी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

इन्फो

अभिव्यक्ती होईल विविध माध्यमांतून

कोरोनाच्या काळात अभिव्यक्त होण्यासाठी केवळ समाजमाध्यमे उपलब्ध असल्याने त्यातूनच सर्व व्यक्ती, कलाकार अभिव्यक्त झाले. मात्र, नजिकच्या भविष्यात कोरोना विषयाला केंद्रस्थानी ठेवून नाटक, कादंबरी आल्यासदेखील आश्चर्य वाटू नये. महामारीमुळे कला काही काळ थबकू शकतात. मात्र, काही कालावधीच्या मंथनानंतर त्यातून निश्चितच नवनीत निर्माण होईल, असा सूरदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला.