शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

त्या’ सहा गावांचा पुन्हा ‘पेसा’त समावेश करा

By admin | Updated: December 19, 2015 23:35 IST

हिवाळी अधिवेशन: वाजे यांची मागणी

सिन्नर: ठाणे जिल्हा विभाजनानंतर पेसा कायद्यातून वगळण्यात आलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील सहा आदिवासीबहुल गावांचा पुन्हा ‘पेसा’त समावेश करण्याची मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी हिवाळी अधिवेशनात केली. पेसा कायद्यातून वगळल्यामुळे आदिवासी भागातील अनुसूचित क्षेत्रातील पदे रिक्त असणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असणे, स्थानिक भाषा अवगत नसणे अशा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सदर आदिवासी गावे विकासापासून वंचित राहत असल्याचे वाजे यांनी विधानसभेत आदिवासी विभागाच्या विधेयकावरील चर्चेप्रसंगी सांगितले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींचा सर्वांगीण विकास, आदिवासी भागाच्या सामाजिक, नैसर्गिक भौगोलिक संपन्नतेसाठी पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे.आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन आणि संवर्धन करणे, ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासीबहुल गावांतील शासन व्यवस्था बळकट करणे आदि कामे पेसा कायद्यांतर्गत केली जातात. या कायद्यामुळे आदिवासी गावांतील स्थानिक युवकांनाच रोजगार दिला जातो. त्यामुळे सदर आदिवासी गावांचा विकास होण्यास हातभार लागणार असल्याने त्यांचा पेसात समावेश करण्याची मागणी वाजे यांनी केली. (वार्ताहर)