cयेवला : येथील विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्र मण काढण्यासाठी ग्रामपंचायत टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ मंदिराचे विश्वस्त येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. पर्यटन विभागाकडून कोटमगाव विठ्ठल मंदिर देवस्थानला भरीव मदत मिळाली आहे. परंतु मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.प्रशासन अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. विठ्ठल देवस्थानचे विश्वस्त दशरथ कोटमे, गणपत ढमाले हे आमरण उपोषणास बसले आहेत. अतिक्रमण काढल्यानंतर रस्ता मोकळा होईल व भाविकांची चांगली सोय होईल, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
अतिक्र मण काढण्यासाठी ग्रामपंचायत टाळाटाळ
By admin | Updated: August 14, 2014 01:34 IST