शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अपहृत युवक सुखरूप परतला

By admin | Updated: January 11, 2015 01:02 IST

गुन्हा : बांधकाम व्यावसायिकाचे एक कोटीच्या खंडणीसाठी झाले होते अपहरण

सिन्नर : पांढुर्ली - भगूर रस्त्यावरील विंचूरदळवी शिवारातून वॅगनार कार अडवून खंडणीसाठी अपहरण केलेल्या नाशिकरोड येथील तरुण बांधकाम व्यावसायिकाला अपहरणकर्त्यांनी संगमनेर तालुक्यात सोडून दिले. अपहरणकर्त्यांनी या युवकाची सुटका केल्यानंतर त्याने वडिलांसोबत संपर्क साधला. त्यानंतर पोलीस त्याला सिन्नरला घेऊन आले. नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या डॉ. कैलास कोलते यांचा मुलगा प्रांजल (२८) याने गेल्या काही दिवसांपूर्वीच पांढुर्ली येथे चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रांजल या कामाची पाहणी करण्यासाठी पांढुर्ली येथे आला होता. त्यानंतर पावणेआठ वाजेच्या सुमारास तो आपल्या वॅगनार कारने (क्र. एमएच १५ बीएक्स ७८५४) परत नाशिकरोडला जात असताना विंचूरदळवी शिवारात इंडिका कारमधून आलेल्या अज्ञात युवकांनी त्याची कार अडकवून त्याला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवून नेले होते. त्यानंतर अज्ञात अपहरणकर्त्यांनी प्रांजलचे वडील डॉ. कैलास कोलते यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पोलिसांकडे न जाण्याचा दम दिला होता. प्रांजलचे अपहरण झाल्यानंतर विंचूरदळवी शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्या वॅगनार कारभोवती परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर घटनास्थळी डॉ. कैलास कोलते व पोलीस आले होते. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात अपहरणकर्त्यां-विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते, अप्पर अधीक्षक गिरीश मोहिते, पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे, पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी याप्रकरणी कमालीची गोपनीयता बाळगून वेगाने तपासाची सूत्रे फिरवून प्रांजलच्या जीविताला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेत अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली होती. (वार्ताहर)