शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डला आधारलिंक बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:16 IST

नाशिक: रेशनकार्डचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला आता रेशनकार्ड आधार आणि मोबाइल क्रमांकाला लिंक करावे लागणार आहे. अन्न व पुरवठा विभागाने ...

नाशिक: रेशनकार्डचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला आता रेशनकार्ड आधार आणि मोबाइल क्रमांकाला लिंक करावे लागणार आहे. अन्न व पुरवठा विभागाने रेशन वितरण यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानांमध्ये जाऊन आधार लिंकींग करावे लागणार आहे. यातून गरजू लाभार्थी समोर येणार असून, बोगस रेशन कार्डधारकही समोर येणार आहेत.

स्वस्त धान्याचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळावा, याबरोबरच लाभार्थ्यांचे लिंकींग असावे, यासाठी अन्न व पुरवठा विभागाने या यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जानेवारी महिन्यात कार्डधारकांना लिंकींग करण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे. रेशन दुकानदारदेखील याबाबतची माहिती कार्डधारकांना देणार आहेत. या मोहिमेतून पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेले रेशनकार्डची मूळ संख्या समेार येणार असून, उर्वरित कार्ड बोगस म्हणून समोर येणार आहेत. लाभार्थ्यांनी रेशन कार्डला आधार व मोबाइल नंबर लिंक करणे बंधनकारक असून, त्यासाठी शासनाने ३१ जानेवारीची अंतिम मुदत दिली आहे.

जिल्ह्यात विविध योजनांचे ३७ लाख रेशनधान्य लाभार्थी आहेत. रेशन प्रणालीतील अन्नधान्याचा लाभार्थ्यांनाच पुरवठा व्हावा, यासाठी ई-पाॅस यंत्रणा अमलात आणली आहे.आता अधिक काटेकोर पडताळणीसाठी कार्डधारकांचे आधार लिंकींग केले जात आहे. जवळच्या रेशन दुकानात जाऊन लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड आधार व मोबाइल नंबरशी लिंक करता येईल. १५ तालुक्यांमध्ये २ हजार ६०९ रेशन धान्य दुकाने असून, जवळपास ३८ लाख रेशन लाभार्थी आहेत. अंत्योदय योजनेचा लाभ घेणारे ८ लाख ८० हजार तर इतर योजनांचे २९ लाख लाभार्थी आहेत. जे लाभार्थी लिंक करणार नाही त्यांना १ फेब्रुवारीनंतर रेशन मिळणेच बंद होणार आहे.

--इन्फो--

अन्यथा १ फेब्रुवारीपासून रेशन बंद

जे लाभार्थी रेशन कार्डला लिंक करणार नाहीत, त्यांना १ फेब्रुवारीपासून रेशन मिळणे बंद होऊ शकते. रेशनच्या यंत्रणेत असलेल्या प्रत्येक कार्डधारकाला आता लिंकींग बंधनकारक करण्यात आल्याने रेशन बंदच्या भीतीने महिनाभरात कार्डधारकांची धावपळ होणार आहे. तांत्रिक अडचणी आल्या नाही, तर हे काम महिनाभरात पूर्ण होऊ शकते.

---कोट---

रेशनधान्याचा पुरवठा योग्य कार्डधारकांना व्हावा आणि जास्तीत जास्त लाभार्थी जोडले जावेत, यासाठी रेशन कार्ड आधार व मोबाइलनंबरशी लिंक करण्याची मोहीम सुरू केली जात आहे. लिंक न करणाऱ्या कार्डधारकांना अन्नधान्य वाटप केले जाणार नाही. लाभार्थ्यांनी रेशनच्या दुकानावर जाऊन कार्ड लिंक करून घ्यावे.

- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी.