शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

जिल्ह्यातील ९२ गावे पूरबाधीत

By admin | Updated: July 12, 2016 01:07 IST

सावधानतेचे आदेश : गटविकास अधिकाऱ्यांना दिले पत्र

नाशिक : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीसह अन्य लहान-मोठ्या नद्यांची पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नैसर्गिक आपत्ती विभागाने जिल्ह्यातील ९२ गावे पूरबाधीत असल्याचे जाहीर केले आहे. या ९२ गावांमधील ग्रामसेवकांना सावधानता बाळगण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी द्यावेत, यासाठी सोमवारी (दि. ११) १५ गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत.सोमवारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह खातेप्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्णातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने पूरबाधीत होऊ शकणाऱ्या संभाव्य गावांची यादी जिल्हा परिषदेला दिली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, मालेगाव, देवळा, निफाड, येवला आदि तालुक्यांतील ९२ गावांमध्ये पूरपरिस्थितीत काय काळजी घ्यावी, काय दक्षता घ्यावी याबाबत सूचना देत आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश दिले. जिल्ह्णातील या ९२ गावांची प्रकल्पनिहाय यादी अशी- गंगापूर प्रकल्प- डावा तीर- जलालपूर, नाशिक, नांदूर, मानूर, पंचक, ओढा, लाखलगाव, दारणासांगवी, बोेंडेगाव, कोठुरे, काथरगाव, चेहेडी, वऱ्हेदारणा, लालपाडी, शिंपीटाकळी, गंगापूर उजवा तीर- गोवर्धन, गंगापूर, आनंदवली, दसक-पंचक, एकलहरे, गंगापाडळी, पालवी, सावळी, गंगावाडी, चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, चाटोरी, दारणा प्रकल्प-डावा तीर- भगूर, संसरी, बेलतगव्हाण, चेहेडी, चाडेगाव, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, दारणासांगावी, उजवा तीर- साकूर, शेणीत, वेळू, राहुरी, दोनवाडे, मानेगाव, शेवगेदारणा, पळसे, बाभळेश्वर, जाखोरी, जोगलटेंभी, कडवा प्रकल्प- डावा तीर- पिंपळगाव डुकरा, शेणीत, उजवा तीर- पिंपळगाव घाडगा, बेलू, भोजापूर प्रकल्प- डावा तीर- चास, नळवाडी, गुंजाळवाडी, संगमनेर, वल्हाळे, उजवा तीर- कासारवाडी, चिकनी, निमगाव(क), राजापूर, पालखेड प्रकल्प- लोखंडेवाडी, जोपूळ, पालखेड, राजापूर, रौळस, कुंदेवाडी, निफाड, करंजवण प्रकल्प- लखमापूर, परमोरी, करंजवण, ओझे, ओझरखेड प्रकल्प- ओझरखेड, वलखेड, आंबेवाडी, करंजी, वाघाड प्रकल्प- वाडा, वलखेड, हातनोरे, निळवंडी, दिंडोरी, पिंपळगाव केतकी, तिसगाव प्रकल्प- तिसगाव, खेडगाव, पुणेगाव प्रकल्प- पुणेगाव, चणकापूर प्रकल्प- लोहोणेर, मालेगाव आदि ठिकाणांचा समावेश आहे. या पूरबाधीत गावांमध्ये व ठिकाणांमध्ये अतिवृष्टीच्या वेळी आवश्यक ती काळजी घेण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)