शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

जिल्ह्यातील ९२ गावे पूरबाधीत

By admin | Updated: July 12, 2016 01:07 IST

सावधानतेचे आदेश : गटविकास अधिकाऱ्यांना दिले पत्र

नाशिक : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीसह अन्य लहान-मोठ्या नद्यांची पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नैसर्गिक आपत्ती विभागाने जिल्ह्यातील ९२ गावे पूरबाधीत असल्याचे जाहीर केले आहे. या ९२ गावांमधील ग्रामसेवकांना सावधानता बाळगण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी द्यावेत, यासाठी सोमवारी (दि. ११) १५ गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत.सोमवारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह खातेप्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्णातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने पूरबाधीत होऊ शकणाऱ्या संभाव्य गावांची यादी जिल्हा परिषदेला दिली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, मालेगाव, देवळा, निफाड, येवला आदि तालुक्यांतील ९२ गावांमध्ये पूरपरिस्थितीत काय काळजी घ्यावी, काय दक्षता घ्यावी याबाबत सूचना देत आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश दिले. जिल्ह्णातील या ९२ गावांची प्रकल्पनिहाय यादी अशी- गंगापूर प्रकल्प- डावा तीर- जलालपूर, नाशिक, नांदूर, मानूर, पंचक, ओढा, लाखलगाव, दारणासांगवी, बोेंडेगाव, कोठुरे, काथरगाव, चेहेडी, वऱ्हेदारणा, लालपाडी, शिंपीटाकळी, गंगापूर उजवा तीर- गोवर्धन, गंगापूर, आनंदवली, दसक-पंचक, एकलहरे, गंगापाडळी, पालवी, सावळी, गंगावाडी, चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, चाटोरी, दारणा प्रकल्प-डावा तीर- भगूर, संसरी, बेलतगव्हाण, चेहेडी, चाडेगाव, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, दारणासांगावी, उजवा तीर- साकूर, शेणीत, वेळू, राहुरी, दोनवाडे, मानेगाव, शेवगेदारणा, पळसे, बाभळेश्वर, जाखोरी, जोगलटेंभी, कडवा प्रकल्प- डावा तीर- पिंपळगाव डुकरा, शेणीत, उजवा तीर- पिंपळगाव घाडगा, बेलू, भोजापूर प्रकल्प- डावा तीर- चास, नळवाडी, गुंजाळवाडी, संगमनेर, वल्हाळे, उजवा तीर- कासारवाडी, चिकनी, निमगाव(क), राजापूर, पालखेड प्रकल्प- लोखंडेवाडी, जोपूळ, पालखेड, राजापूर, रौळस, कुंदेवाडी, निफाड, करंजवण प्रकल्प- लखमापूर, परमोरी, करंजवण, ओझे, ओझरखेड प्रकल्प- ओझरखेड, वलखेड, आंबेवाडी, करंजी, वाघाड प्रकल्प- वाडा, वलखेड, हातनोरे, निळवंडी, दिंडोरी, पिंपळगाव केतकी, तिसगाव प्रकल्प- तिसगाव, खेडगाव, पुणेगाव प्रकल्प- पुणेगाव, चणकापूर प्रकल्प- लोहोणेर, मालेगाव आदि ठिकाणांचा समावेश आहे. या पूरबाधीत गावांमध्ये व ठिकाणांमध्ये अतिवृष्टीच्या वेळी आवश्यक ती काळजी घेण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)