शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९२ गावे पूरबाधीत

By admin | Updated: July 12, 2016 01:07 IST

सावधानतेचे आदेश : गटविकास अधिकाऱ्यांना दिले पत्र

नाशिक : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीसह अन्य लहान-मोठ्या नद्यांची पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नैसर्गिक आपत्ती विभागाने जिल्ह्यातील ९२ गावे पूरबाधीत असल्याचे जाहीर केले आहे. या ९२ गावांमधील ग्रामसेवकांना सावधानता बाळगण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी द्यावेत, यासाठी सोमवारी (दि. ११) १५ गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत.सोमवारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह खातेप्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्णातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने पूरबाधीत होऊ शकणाऱ्या संभाव्य गावांची यादी जिल्हा परिषदेला दिली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, मालेगाव, देवळा, निफाड, येवला आदि तालुक्यांतील ९२ गावांमध्ये पूरपरिस्थितीत काय काळजी घ्यावी, काय दक्षता घ्यावी याबाबत सूचना देत आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश दिले. जिल्ह्णातील या ९२ गावांची प्रकल्पनिहाय यादी अशी- गंगापूर प्रकल्प- डावा तीर- जलालपूर, नाशिक, नांदूर, मानूर, पंचक, ओढा, लाखलगाव, दारणासांगवी, बोेंडेगाव, कोठुरे, काथरगाव, चेहेडी, वऱ्हेदारणा, लालपाडी, शिंपीटाकळी, गंगापूर उजवा तीर- गोवर्धन, गंगापूर, आनंदवली, दसक-पंचक, एकलहरे, गंगापाडळी, पालवी, सावळी, गंगावाडी, चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, चाटोरी, दारणा प्रकल्प-डावा तीर- भगूर, संसरी, बेलतगव्हाण, चेहेडी, चाडेगाव, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, दारणासांगावी, उजवा तीर- साकूर, शेणीत, वेळू, राहुरी, दोनवाडे, मानेगाव, शेवगेदारणा, पळसे, बाभळेश्वर, जाखोरी, जोगलटेंभी, कडवा प्रकल्प- डावा तीर- पिंपळगाव डुकरा, शेणीत, उजवा तीर- पिंपळगाव घाडगा, बेलू, भोजापूर प्रकल्प- डावा तीर- चास, नळवाडी, गुंजाळवाडी, संगमनेर, वल्हाळे, उजवा तीर- कासारवाडी, चिकनी, निमगाव(क), राजापूर, पालखेड प्रकल्प- लोखंडेवाडी, जोपूळ, पालखेड, राजापूर, रौळस, कुंदेवाडी, निफाड, करंजवण प्रकल्प- लखमापूर, परमोरी, करंजवण, ओझे, ओझरखेड प्रकल्प- ओझरखेड, वलखेड, आंबेवाडी, करंजी, वाघाड प्रकल्प- वाडा, वलखेड, हातनोरे, निळवंडी, दिंडोरी, पिंपळगाव केतकी, तिसगाव प्रकल्प- तिसगाव, खेडगाव, पुणेगाव प्रकल्प- पुणेगाव, चणकापूर प्रकल्प- लोहोणेर, मालेगाव आदि ठिकाणांचा समावेश आहे. या पूरबाधीत गावांमध्ये व ठिकाणांमध्ये अतिवृष्टीच्या वेळी आवश्यक ती काळजी घेण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)