शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

जिल्ह्यात ६८ टक्के !

By admin | Updated: February 21, 2017 23:40 IST

मतदान शांततेत : सर्वाधिक पेठ, तर सर्वात कमी नाशिकमध्ये

नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सुमारे ६८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पेठ तालुक्यात ७६ टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान नाशिक तालुक्यात ४२.०६ टक्के झाले. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. सकाळी मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह होता. मात्र दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिंडोरी तालुक्यातील वणीनजीक भातोडे गावात इव्हीएम यंत्रात तांत्रिक अडचणीने अनेकांना खोळंबून राहावे लागले. असाच प्रकार कळवण, त्र्यंबकेश्वर येथे घडल्याने मतदारांमध्ये संताप व्यक्त होत होता. निफाड तालुक्यातील ओझर येथेही मतदार याद्यांमधील घोळामुळे अनेक मतदार मतदान न करताच निघून गेले. मालेगाव तालुक्यात किरकोळ वादाचे प्रकार घडले. या तालुक्यातही दुपार सत्रानंतरच मतदारांनी घराबाहेर पडणे पसंत केल्याने शेवटच्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी झाली होती.देवळा तालुक्यातील खामखेडा येथील मतदान केंद्रांवर लांबलचक रांग लागल्यामुळे चक्कर आल्याने एका महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.कसबे सुकेणे आणि मौजे सुकेणे येथील मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. द्राक्ष हंगाम सुरू असल्याने या भागातील मतदान केंद्रांवर सकाळी मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. कसबे सुकेणे गट हा जिल्हा परिषदेसाठी आरक्षित असल्याने प्रचाराच्या सुरुवातीला काहीसा  निरुत्साह असला तरी मात्र शेवटच्या टप्प्यात निर्माण झालेल्या चुरशीमुळे प्रत्येक पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. त्यामुळे त्याभागातील मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम झाला आणि उत्साह वाढला. कसबे सुकेणे गटातील सर्व गावे ही द्राक्ष उत्पादक असल्याने या भागात द्राक्ष खुडही सुरू आहे. त्यामुळे मजूरवर्गाने मतदान करून कामावर जाणे पसंत केले म्हणून कसबे सुकेणे गटातील कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, साकोरे मिग, कोकणगाव, वडाळी, दीक्षी या भागात मतदानकेंद्रावर सकाळपासून गर्दी होती.(लोकमत ब्युरो)