शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

३५ हजार कार्डधारकांनी बदलले रेशनचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST

नाशिक: शिधापत्रिकाधारकांना आपल्या पसंतीनुसार रेशनधान्य दुकान निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजपर्यंत या सुविधेचा लाभ ३५ हजार ...

नाशिक: शिधापत्रिकाधारकांना आपल्या पसंतीनुसार रेशनधान्य दुकान निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजपर्यंत या सुविधेचा लाभ ३५ हजार कार्डधारकांना घेतला आहे. घराजवळ दुकान असावे तसेच रेशनदुकानदाराबाबत असलेली तक्रार अशा दोन कारणांमुळे दुकाने बदलून घेतलेल्या कार्डधारकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे.

रेशनदुकानदारांच्या माध्यमातून कार्डधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळी तसेच साखरदेखील कार्डाच्या गटावरून रेशन दिले जाते. पिवळे, पांढरे आणि केशर कार्डधारकांना देय असलेल्या रेशनचा पुरवठा दुकानदारांच्या माध्यमातून केला जातो. परंतु कार्डधारकाला रेशनदुकानदाराबाबत तसेच वितरण प्रणालीतील अडचणीमुळे काही तक्रार असेल तर त्यांना आपले दुकान बदलण्याची सुविधा पोर्टेबिलटीच्या माध्यमातून करून देण्यात आली आहे.

अनेकदा दुकानदारांविषयी कार्डधारकांच्या तक्रारी असतात. एकतर दुकानाची वेळ आणि धान्याच्या दर्जाबाबत तसेच धान्य संपल्याच्या तक्रारीमुळे कार्डधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दुकानदार दुकान उघडत नसल्याने ग्राहकांना परतावे लागते. अनेकदा तारीख उलटून गेली तरी रेशनचे धान्य मिळत नाही. अनेकदा दुकानदाराच्या वर्तणुकीचीदेखील तक्रार असते. अशावेळी ग्राहकांना पार्टबिलिटी सुविधेचा लाभ होता. नाशिक जिल्ह्यात जून अखेरपर्यंत सुमारे ३५ हजार ग्राहकांनी अनेकविध कारणांनी आपली दुकाने बदलून घेतली आहेत.

--इन्फेा--

शहरात अधिक बदल

नाशिक जिल्ह्यातील रेशनकार्ड पोर्टेबिलिटी योजनेची आकडेवारी पाहिली तर नाशिक महापालिका तसेच नाशिक तालुक्यातील रेशनकार्डधारकांनी जास्ती जास्त या योजनेचा लाभ घेतला आहे. नाशिक धान्य पुरवठा विभागांतर्गत ९,५९२, तर नाशिक तालुक्यातील ६,९९५ इतक्या कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शहरामध्ये ग्राहकांमध्ये असलेल्या जनजागृतीमुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोक्ष असल्याचे दिसते.

--इन्फो--

मेाफत धान्य मात्र तक्रारीही वाढल्या

गरीक कुटुंब कल्याण योजनेंतर्गत कार्डधारकांना येत्या नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य दिले जाणार आहे. मात्र मोफत धान्याचा पुरेसा लाभ मिळत नसल्याची प्रमुख तक्रार असते. अनेकदा दोन महिन्यांचे एकदम धान्य दिले जाते मात्र धान्याचा दर्जा निकृष्ट असतो अशा तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. अशा दुकानदारांविषयी तक्रारीदेखील होत असल्याने अशा दुकानदारांची सरप्राइज चेकिंगदेखील केली जाते.

--इन्फो--

३५,२१४

रेशनकार्डधारकांनी बदलला दुकानदार

१२२८३२९

जिल्ह्यातील एकूण कार्डधारक

५८५३५१

बीपीएल

१७२३४६

अंत्योदय

४७०६२९

केशरी