शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

सिन्नर तालुक्यात कोरोनाचे ३ हजार ८५२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:15 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे येथे २४ मार्च, २०२० रोजी तालुक्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर, ...

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे येथे २४ मार्च, २०२० रोजी तालुक्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर, नऊ महिन्यांत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ८५२ झाली. आतापर्यंत तालुक्यातील ८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळातही समृद्धी व सिन्नर-शिर्डी महामार्गाचे काम सुरू राहिल्याने सदर प्रकल्पाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने आहे.

मालेगाव येथून आलेल्या पाथरे येथील ग्रामस्थाला कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यानंतर, तालुका २४ मार्च रोजी हादरून गेला होता. त्यानंतर, पाथरे व परिसरातील सात गावांमध्ये १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर, तालुकाभर सर्वदूर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर, तालुक्यात सुमारे तीन महिने कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता. कोरोनाचा नायलाट करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आले. सिन्नर शहरासह गावोगावी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात आली. पायी जाणारे मजूर व प्रवाशांना थांबवून वावी, सिन्नर व नांदूरशिंगोटे येथे निवारागृह उभारण्यात आले होते. त्यात या वाटसरू व प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर, काही दिवसांनी प्रशासनाने त्यांना रेल्वे व बसने त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था केली होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालय व मुसळगाव शिवारात इंडिया बुल्स येथे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. या दोन्ही रुग्णालयांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने जागाही अपूर्ण पडू लागली होती.

३० डिसेंबरपर्यंत तालुक्यात ३ हजार ८५२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यातील ३ हजार ६०१ रुग्णांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला, तर आजमितीस तालुक्यात १६४ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात व घरी उपचार सुरू आहेत.

-------------------

कोरोना या महामाारीचा सिन्नर तालुक्यात संसर्ग सुरू झाल्यानंतर, सर्वच व्यवसाय व विकासकामे ठप्प झाली होती. तथापि, मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम सुरू होते. हे काम बंद करण्यासाठी मजुरांसह स्थानिक ग्रामस्थांनीही प्रशासनावर प्रचंड दडपण आणले होते. मात्र, प्रशासनाने खबरदारी घेत काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत सदर काम प्रगतिपथावर आहे. सिन्नर-शिर्डी या चौपदरीकरणाच्या कामासही लॉकडाऊनच्या काळात प्रारंभ झाला. या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. कोरोनाच्या काळात सदर दोन्ही विकासकामे सुरू ठेवल्याने ती वर्षअखेरीस चांगल्या प्रगतिपथावर आल्याचे दिसून येते.