शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २० हजार मोलकरणींना मिळणार मदत; ३० हजार महिलांनी खायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST

नोंदणी आवश्यक आहे. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच मदत मिळणार असल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील ...

नोंदणी आवश्यक आहे. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच मदत मिळणार असल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील शासनाने या मंडळाला अर्थसाहाय्य दिले नसल्याने अनेक महिलांनी नोंदणीचे नूतनीकरण केलेले नाही त्याचाही प्रश्न आता निर्माण झाला आहे. याबाबत राज्य शासन काय निर्णय घेते याकडे अनेक मोलकरणींचे लक्ष लागले आहे. चौकट-

जिल्ह्यातील मोलकरणींची संख्या - ५००००

नोंदणीकृत मोलकरणींची संख्या -२००००

चौकट-

संत जनाबाई योजना कागदावरच

असंघटित कामगारांसाठी सुरक्षा मंडळ स्थापन करण्याचा कायदा २००९ मध्ये स्थापन झाला. त्यानंतर दोन वर्षे सुरक्षा मंडळ स्थापन करण्यासाठी लागली. मात्र त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने या मंडळांसाठी आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे या मंडळांचे काम बंद पडले असून अनेक महिलांची नोंदणी होऊ शकलेली नाही. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांचे नूतनीकरण झालेले नाही. संत जनाबाई योजना सुरू करण्याची घाेषणा झाली, मात्र त्याबाबत अद्याप कोणतेही आदेश खालपर्यत आले नसल्याने ही योजना कागदावरच आहे.

कोट -

मी २० वर्षांपासून मोलकरणीचे काम करते, पण माझी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे आता मला मदत मिळणार नाही. दोन मुलांचे पोट कसे भरावे आणि घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न पडला आहे. - मंगल पवार

कोट-

ज्यांनी नोंदणी केली त्यांनाच शासन मदत देणार असल्याने बाकीच्यांनी जगायचे कसे? मोलकरीण संघटनेने यासाठी आवाज उठवावा व आम्हाला मदत मिळवून द्यावी. - कमलबाई हाटे

कोट -

सन २०११ पासून नोंदणी झालेली आहे, पण नूतनीकरण केलेले नाही, अशा सर्व घरेलू कामगार महिलांना राज्य शासनाने सरसकट मदत द्यायला हवी, अशी आमची मागणी आहे. नोंदणी केल्यानंतर त्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक महिलांनी नूतनीकरण केलेले नाही. - कॉ. राजू देसले, कार्याध्यक्ष मोलकरणी संघटना