शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

जिल्ह्यातील २० हजार मोलकरणींना मिळणार मदत; ३० हजार महिलांनी खायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST

नोंदणी आवश्यक आहे. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच मदत मिळणार असल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील ...

नोंदणी आवश्यक आहे. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच मदत मिळणार असल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील शासनाने या मंडळाला अर्थसाहाय्य दिले नसल्याने अनेक महिलांनी नोंदणीचे नूतनीकरण केलेले नाही त्याचाही प्रश्न आता निर्माण झाला आहे. याबाबत राज्य शासन काय निर्णय घेते याकडे अनेक मोलकरणींचे लक्ष लागले आहे. चौकट-

जिल्ह्यातील मोलकरणींची संख्या - ५००००

नोंदणीकृत मोलकरणींची संख्या -२००००

चौकट-

संत जनाबाई योजना कागदावरच

असंघटित कामगारांसाठी सुरक्षा मंडळ स्थापन करण्याचा कायदा २००९ मध्ये स्थापन झाला. त्यानंतर दोन वर्षे सुरक्षा मंडळ स्थापन करण्यासाठी लागली. मात्र त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने या मंडळांसाठी आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे या मंडळांचे काम बंद पडले असून अनेक महिलांची नोंदणी होऊ शकलेली नाही. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांचे नूतनीकरण झालेले नाही. संत जनाबाई योजना सुरू करण्याची घाेषणा झाली, मात्र त्याबाबत अद्याप कोणतेही आदेश खालपर्यत आले नसल्याने ही योजना कागदावरच आहे.

कोट -

मी २० वर्षांपासून मोलकरणीचे काम करते, पण माझी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे आता मला मदत मिळणार नाही. दोन मुलांचे पोट कसे भरावे आणि घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न पडला आहे. - मंगल पवार

कोट-

ज्यांनी नोंदणी केली त्यांनाच शासन मदत देणार असल्याने बाकीच्यांनी जगायचे कसे? मोलकरीण संघटनेने यासाठी आवाज उठवावा व आम्हाला मदत मिळवून द्यावी. - कमलबाई हाटे

कोट -

सन २०११ पासून नोंदणी झालेली आहे, पण नूतनीकरण केलेले नाही, अशा सर्व घरेलू कामगार महिलांना राज्य शासनाने सरसकट मदत द्यायला हवी, अशी आमची मागणी आहे. नोंदणी केल्यानंतर त्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक महिलांनी नूतनीकरण केलेले नाही. - कॉ. राजू देसले, कार्याध्यक्ष मोलकरणी संघटना