शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूर परिसरात २० तास वीज गायब

By admin | Updated: May 10, 2016 00:51 IST

ममदापूर परिसरात २० तास वीज गायब

 ममदापूर : परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे विद्युतपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उत्तरपूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सर्व विहिरी कोरड्याठाक झाल्या असून, माणसासह जनावरेही पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे बोअरवेलमधून पिण्याच्या पाण्यासाठी विद्युतपुरवठा गरजेचा आहे. मात्र वीस तास उलटूनदेखील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. ममदापूर, खंरवडी, देवदरी या परिसरात राजापूर येथील उपक्र ेंदातून विद्युतपुरवठा करण्यात येतो. तेथे लहित फिडर व ममदापूर फिडर असे दोन फिडर असून राजापूर हे लहित फिडरवर असल्याने या गावांचा विद्युतपुरवठा कधीच खंडित होत नाही; मात्र ममदापूर, खरवंडी, देवदरी या परिसरात पावसाळ्यात नेहमीच विस पंचवीस तास विद्युतपुरवठा खंडित होत असतो. राजापूर येथे वीज कंपनीचे कर्मचारी राहण्यासाठी दोन मजली इमारत असूनही सर्व आधिकारी बाहेरगावी राहून येथील कारभार पाहात असल्याने थोडा जरी खोळंबा झाला तरी दहा-बारा तास विद्युतपुरवठा सुरळीत होत नाही. कदाचित झाला आणि लोडशेडिंगचा वेळ झाला की सबस्टेशनमधुन विद्युतपुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे शेतकरी मोटार चालू करण्याच्या आत वीज जाते त्यामुळे आणखी सहा सात तास वाट बघावी लागते. तसेच वाड्या-वस्त्यांवर दहा ते पंधरा दिवसात एक टँकर येत आसल्याने माणसासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागातील विद्युत तारा जीर्ण झाल्याने विजेचा खोळंबा होत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)