शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

ममदापूर परिसरात २० तास वीज गायब

By admin | Updated: May 10, 2016 00:51 IST

ममदापूर परिसरात २० तास वीज गायब

 ममदापूर : परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे विद्युतपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उत्तरपूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सर्व विहिरी कोरड्याठाक झाल्या असून, माणसासह जनावरेही पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे बोअरवेलमधून पिण्याच्या पाण्यासाठी विद्युतपुरवठा गरजेचा आहे. मात्र वीस तास उलटूनदेखील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. ममदापूर, खंरवडी, देवदरी या परिसरात राजापूर येथील उपक्र ेंदातून विद्युतपुरवठा करण्यात येतो. तेथे लहित फिडर व ममदापूर फिडर असे दोन फिडर असून राजापूर हे लहित फिडरवर असल्याने या गावांचा विद्युतपुरवठा कधीच खंडित होत नाही; मात्र ममदापूर, खरवंडी, देवदरी या परिसरात पावसाळ्यात नेहमीच विस पंचवीस तास विद्युतपुरवठा खंडित होत असतो. राजापूर येथे वीज कंपनीचे कर्मचारी राहण्यासाठी दोन मजली इमारत असूनही सर्व आधिकारी बाहेरगावी राहून येथील कारभार पाहात असल्याने थोडा जरी खोळंबा झाला तरी दहा-बारा तास विद्युतपुरवठा सुरळीत होत नाही. कदाचित झाला आणि लोडशेडिंगचा वेळ झाला की सबस्टेशनमधुन विद्युतपुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे शेतकरी मोटार चालू करण्याच्या आत वीज जाते त्यामुळे आणखी सहा सात तास वाट बघावी लागते. तसेच वाड्या-वस्त्यांवर दहा ते पंधरा दिवसात एक टँकर येत आसल्याने माणसासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागातील विद्युत तारा जीर्ण झाल्याने विजेचा खोळंबा होत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)