शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ममदापूर परिसरात २० तास वीज गायब

By admin | Updated: May 10, 2016 00:51 IST

ममदापूर परिसरात २० तास वीज गायब

 ममदापूर : परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे विद्युतपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उत्तरपूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सर्व विहिरी कोरड्याठाक झाल्या असून, माणसासह जनावरेही पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे बोअरवेलमधून पिण्याच्या पाण्यासाठी विद्युतपुरवठा गरजेचा आहे. मात्र वीस तास उलटूनदेखील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. ममदापूर, खंरवडी, देवदरी या परिसरात राजापूर येथील उपक्र ेंदातून विद्युतपुरवठा करण्यात येतो. तेथे लहित फिडर व ममदापूर फिडर असे दोन फिडर असून राजापूर हे लहित फिडरवर असल्याने या गावांचा विद्युतपुरवठा कधीच खंडित होत नाही; मात्र ममदापूर, खरवंडी, देवदरी या परिसरात पावसाळ्यात नेहमीच विस पंचवीस तास विद्युतपुरवठा खंडित होत असतो. राजापूर येथे वीज कंपनीचे कर्मचारी राहण्यासाठी दोन मजली इमारत असूनही सर्व आधिकारी बाहेरगावी राहून येथील कारभार पाहात असल्याने थोडा जरी खोळंबा झाला तरी दहा-बारा तास विद्युतपुरवठा सुरळीत होत नाही. कदाचित झाला आणि लोडशेडिंगचा वेळ झाला की सबस्टेशनमधुन विद्युतपुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे शेतकरी मोटार चालू करण्याच्या आत वीज जाते त्यामुळे आणखी सहा सात तास वाट बघावी लागते. तसेच वाड्या-वस्त्यांवर दहा ते पंधरा दिवसात एक टँकर येत आसल्याने माणसासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागातील विद्युत तारा जीर्ण झाल्याने विजेचा खोळंबा होत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)