शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्ह्यात १८ लाख वाहने अन‌् पीयूसीची चाचणी केवळ ५ हजार वाहनांचीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:25 IST

नाशिक : वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारे हानिकारक वायूचे प्रमाण नियंत्रणात राहावे, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांची चाचणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे १७ लाख ७७ हजार ४७४ वाहने रस्त्यांवर धावत असल्याची नोंद आरटीओच्या दप्तरी आहे; मात्र यापैकी पीयूसी चाचणी करत प्रमाणपत्र मिळविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण अत्यल्प आहे. जेमतेम ५ हजार २५८ वाहनांची पीयूसी चाचणी झाली आहे.

ठळक मुद्दे१९८ पीयूसी सेंटर : साडेनऊ लाखांचा दंड वसूल; प्रदूषण नियंत्रणाबाबत उदासीनता

नाशिक : वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारे हानिकारक वायूचे प्रमाण नियंत्रणात राहावे, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांची चाचणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे १७ लाख ७७ हजार ४७४ वाहने रस्त्यांवर धावत असल्याची नोंद आरटीओच्या दप्तरी आहे; मात्र यापैकी पीयूसी चाचणी करत प्रमाणपत्र मिळविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण अत्यल्प आहे. जेमतेम ५ हजार २५८ वाहनांची पीयूसी चाचणी झाली आहे.नाशिककर दरवर्षी मोठ्या संख्येने दुचाकी, चार चाकी, तीन चाकी वाहने रस्त्यावर आणतात. शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असून, दिवसेंदिवस वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारा कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइडसारख्या घातक वायूंचे प्रमाण कमी राहावे, याकरिता वाहनांची पीयूसी चाचणी केली जाते. पीयूसी प्रमाणपत्राची वैधता ही वर्षभरासाठी असते. पीयूसी प्रमाणपत्र मिळविणे हे अत्यंत सोपे व कमी खर्चीक असूनदेखील उदासीन नाशिककरांकडून आपल्या वाहनांची चाचणी करून ते सोबत बाळगले जात नसल्याचे समोर येते. एकूणच प्रदूषणाला आळा घालून नाशिकची ह्यहवाह्ण शुद्ध ठेवण्यासाठी नाशिककरांकडून मात्र कानाडोळा केला जात आहे.मोटार वाहन कायद्यानुसार पीयूसी प्रमाणपत्र जर सोबत नसेल तर कलम-१९०(२) नुसार दंडात्मक कारवाईसाठी संबंधित वाहनचालक पात्र ठरतो. प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार निरीक्षकांसह वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केला जाऊ शकतो.असे आहेत प्रदूषित वाहने तपासणीचे दरकार- (हलकी वाहने)- ९० ते १२० रुपयेदुचाकी- ३५ रुपयेट्रक (जड वाहने)- १२० रुपये९४५ गुन्हे दाखलएप्रिल २०१९ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुमारे ५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, ९४५ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच एकूण ९ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.वाहन इन्शुरन्स हवाय, मग पीयूसी काढावाहन विमा उतरविणाऱ्या सर्वच कंपन्यांकडून वाहनांचा विमा काढताना पीयूसी प्रमाणपत्र आता बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे दुचाकीपासून चार चाकी वाहनांपर्यंत ज्या वाहनचालकांना आपल्या वाहनांचा विमा काढायचा असेल त्यांना तत्पूर्वी वैध पीयूसी प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे आता पीयूसी चाचणीचे प्रमाण वाढणार आहे.जिल्ह्यातील एकूण वाहने - १७,७७,४७४जिल्ह्यातील पीयूसी सेंटर- १९८ 

टॅग्स :GovernmentसरकारTrafficवाहतूक कोंडी