शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१५० बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:17 IST

नाशिक : कोरेानाच्या निर्बंधाचा सर्वाधिक फटका बसला तो एस. टी. महामंडळाला. गेल्या दीड वर्षांपासून एस. टी. आर्थिक संकटातून जात ...

नाशिक : कोरेानाच्या निर्बंधाचा सर्वाधिक फटका बसला तो एस. टी. महामंडळाला. गेल्या दीड वर्षांपासून एस. टी. आर्थिक संकटातून जात आहे. प्रवासी वाहतूक पुरेशा क्षमतेने सुरू नसल्यामुळे नियमित उत्पन्नात मोठी घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न उभा राहतो. आता निर्बंध बऱ्यापैकी उठविले गेले असले तरी प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री देता यावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एस.टी बसेस ’कोरोना फ्री’ करवून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार या बसेस विशिष्ट द्रव्याच्या साह्याने काेरोना फ्री केल्या जात आहेत. त्यामुळे जवळपास तीन महिने या बसेस वायरस फ्री राहाणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.

नाशिक विभागातील सुमारे ५४० बसेस या टप्प्याटप्याने मायक्रोबिअल कोटिंग केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. मात्र, प्रवाशांनी बसेसमध्ये देखील दक्षता घेणे अपेक्षित आहे. चेहऱ्याला मास्कचा वापरणे करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.

--इन्फो--

किती बसेसला कोटिंग?

नाशिक-१: ९०------------६०

पिंपळगाव : ३०--------------००

येवला : ३०----------------००

पेठ: २५-------------------००

कळवण: ४५----------------००

इगतपुरी: २५-----------------००

नांदगाव : ४०------------------००

सटाणा: ५०-------------------००

सिन्नर: ५०---------------- ५०

मनमाड: ४०---------------००

मालेगाव : ४५---------------००

पंचवटी: ४०----------------४०

--इन्फो--

एका वर्षात चारवेळा होणार कोटिंग

एकदा बसला कोटिंग केले तर त्याचा प्रभाव हा किमान तीन महिने राहाणार आहे. त्यामुळे तीन महिने तर अशा बसमधून प्रवास सुरक्षित ठरणार आहे. या बसेस वर्षभर सुरू राहाणार असल्यामुळे वर्षातून चार वेळा एका बसला मायक्रोबिअल कोटींग केले जाणार आहे. याबाबचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील १३ आगारांचे नियोजन करण्यात आले आहे.

--इन्फो--

बाधित व्यक्ती उठून गेली असेल तर धोका नाही; पण बाजूला बसला असल्यास?

१) मायक्रोबिअल कोटिंग केल्यानंतर बसचा आतील भाग, सीट, दांडा, म्हणजे जेथे जेथे हात लागेल अशी जागा सुरक्षित असणार आहे.

२) जर एखाद्या प्रवाशाने मास्क लावलेला नसेल आणि तो बाधित असेल तर मात्र त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला धोका असू शकतो.

--इन्फो---

प्रवासी म्हणतात

बसमधून प्रवास करणे सुरक्षित असतेच आता मायक्रोबिअल कोटिंग होणार असल्यामुळे सुरक्षितता अधिक वाढणार आहे. त्यामुळे अधिक निश्चिंतपणे प्रवास होऊ शकेल. सर्वच प्रवाशांनी स्वत:ची काळजी घेतली तर सर्वांनाच त्याचा लाभ होईल.

- अरविंद कानडे, प्रवासी

प्रवाशांच्या हितासाठी महामंडळाकडून उचलण्यात आलेेले पाऊल सकारात्मक आहे. अडचणीच्या काळातून एस.टी. जात असतानाही प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी जर अशाप्रकार कोटिंग केले जाणार असेल तर महामंडळाचे आभार मानायला हवे. प्रवाशांच्या हिताला एस.टी.ने नेहमीच प्राधान्य दिले आहे.

- भागवत राऊत, प्रवासी

कोरोनाचे संकट असतांनाही लोकांना प्रवास करणे महत्त्वाचे असते अशावेळी मायक्रोबिअल कोटिंग केलेल्या बसमधून प्रवास करण्याचा दिलासा मिळणार आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या आमच्यासारख्या प्रवाशांना यामुळे मोठा आधार वाटत आहे. महामंडळाकडून अशी संकल्पना राबविणे कौतुकास्पद आहे.

- श्याम कुंभकर्ण, प्रवासी.