शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

१३ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: November 6, 2015 22:04 IST

एलबीटी : विवरणपत्र दाखल न केल्यास कारवाई

नाशिक : राज्य शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीतील विवरणपत्र दाखल न करणाऱ्या थकबाकीदारांना महापालिकेने करभरणा करण्याचे आवाहन केले होते. त्याची मुदत ३१ आॅक्टोबरला संपूनही विवरणपत्र दाखल न करणाऱ्या १३ हजार १३६ व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत प्रतिसाद न मिळाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईबरोबर बॅँक खाती सील केली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली. राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आत ज्या व्यापाऱ्यांची खरेदी व विक्रीची उलाढाल आहे, अशा व्यापाऱ्यांचा एलबीटी १ आॅगस्ट २०१५ पासून रद्द केला आहे. त्यामुळे सुमारे ३३ हजार व्यापाऱ्यांची एलबीटीपासून मुक्तता झाली आहे. मात्र, महापालिकेकडून ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीवर कर आकारणी सुरूच आहे. दरम्यान, राज्य शासनाने १ आॅगस्टपासून ५० कोटींच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द केला असला तरी, चालू आर्थिक वर्षातील १ एप्रिल ते ३१ जुलै २०१५ या कालावधीतील विवरणपत्र दाखल करणे व्यापाऱ्यांना अनिवार्य आहे. असंख्य व्यापाऱ्यांनी एलबीटी माफ झाल्याच्या घोषणेनंतर महापालिकेकडे विवरणपत्र दाखल केलेले नाही. महापालिकेने अशा करभरणा व विवरणपत्र मुदतीत दाखल न केलेल्या व्यापाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करत, १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीतील विवरणपत्र भरण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. प्रामुख्याने १ एप्रिलनंतर ९० दिवसांच्या आत व्यापाऱ्यांनी विवरणपत्र भरणे बंधनकारक असते; परंतु अनेकांनी मुदतीत विवरणपत्र दाखल केले नसल्याने महापालिकेने मुदत वाढवून दिली होती. मात्र, आता दि. ३१ आॅक्टोबरला मुदत संपूनही १३ हजार १३६ व्यापारी-व्यावसायिकांनी विवरणपत्रासह थकबाकीचा भरणा केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यापाऱ्यांनी नोटीस बजावल्यापासून पंधरा दिवसांच्या आत विवरणपत्र दाखल न केल्यास त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारला जाणार असून, त्यांची बॅँक खाती सील करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे फडोळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)