शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पहिल्याच दिवशी १२५ तक्रारी

By admin | Updated: September 17, 2015 00:07 IST

मनपाचे अ‍ॅप्स : दोन हजार नागरिकांकडून अ‍ॅप्स डाऊनलोड

नाशिक : महापालिका अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आणलेल्या मोबाइल अ‍ॅप्सवर पहिल्याच दिवशी सुमारे १२५ तक्रारी दाखल झाल्या, तर सुमारे दोन हजार नागरिकांनी अ‍ॅप्स डाउनलोड केले. ड्रेनेज, आरोग्य व विद्युत विभागातील सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांना आता घरबसल्या तक्रारींची सुविधा प्राप्त झाली असली, तरी प्रशासनाला दिलेल्या मुदतीत तक्रारींचे निवारण करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या ‘स्मार्ट नाशिक’ या मोबाइल अ‍ॅप्सचे लोकार्पण मंगळवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाल्यानंतर दीड दिवसात शहरातील सुमारे दोन हजार नागरिकांनी अ‍ॅप्सचे रजिस्ट्रेशन करत डाउनलोड करून घेतले. त्यानंतर, बुधवारी पहिल्याच दिवशी अ‍ॅप्सवर सुमारे १२५ तक्रारी प्राप्त झाल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्वसाधारपणे, महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षाकडे महिन्याला सुमारे ३२५ ते ३५० तक्रारी प्राप्त होत असतात. परंतु आता मोबाइल अ‍ॅप्समुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या तक्रारी अथवा सूचना मांडणे शक्य होणार आहे. महापालिकेच्या या अ‍ॅप्सबाबत नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिकेच्या गतिमान प्रशासनाचे कौतुक केले जात असतानाच या अ‍ॅप्सच्या उपयुक्ततेबाबत शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. प्रामुख्याने नगरसेवकांकडून अ‍ॅपपेक्षा प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा गॅप भरून काढण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी अ‍ॅपवर तक्रार दाखल केल्यानंतर त्याची दिलेल्या मुदतीत अंमलबजावणी करण्याचे आव्हान आता प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. आयुक्तांनीही त्याबाबत पुढील दोन महिने आव्हानात्मक असल्याची कबुली दिली आहे. या गतिमान प्रशासनाचा धसका आता काही अधिकाऱ्यांनीही घेतला असून ‘रात्रंदिन आता आम्हा युद्धाचा प्रसंग’अशी टीपणीही महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. (प्रतिनिधी)