शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
4
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
5
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
6
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
7
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
8
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
9
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
10
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
11
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
12
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
13
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
14
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
15
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
16
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
17
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
18
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
19
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

विभागासाठी ११९८ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर

By admin | Updated: February 21, 2015 01:12 IST

अवघा ४० टक्के निधी खर्च, नाशिक विभागीय आढावा बैठक

  नाशिक : आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी उपयोजनेच्या नाशिक विभागाच्या सन-२०१५-१६ च्या ११९८ कोटी ४० लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. ज्या विभागाची मागणी नसल्यास आणि खर्च होण्याची शक्यता कमी असल्यास तो निधी मागणी असलेल्या अन्यत्र विभागाकडे वळविण्याच्या सूचना प्रधानसचिव राजगोपाल देवरा यांनी दिल्या. तसेच निधी वेळेत शंभर टक्के खर्च करण्याचे आदेश आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार व अहमदनगर जिल्'ातील सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची विभागीय बैठक बोलविण्यात आली होती. त्यात जिल्हानिहाय मागणी केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार योजनांचा आढावा घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या प्रारूप आराखड्यात १८ टक्क्यांनी म्हणजेच ११२ कोटींची वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीलाच नाशिक जिल्'ाचा आढावा घेण्यात आला. राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार राज्यभरातील शंभर टक्के आदिवासी गावे असलेल्या २८०० ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाखांचा विशेष निधी विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे राजगोपाल देवरा यांनी सांगितले. हा निधी ग्रामपंचायतींना थेट वर्ग करण्यात येणार असून तो रस्ते, सभामंडप, ग्रामपंचायत, अंगणवाडी यासह विविध कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. ज्या विभागांनी मागणी केली असेल, मात्र आढावा बैठकांना असे अधिकारीच हजर नसतील तर त्या विभागांचा निधी रोखण्याचे आदेश मंत्री महोदयांना दिले असून, ठाणे जिल्'ात सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभागाचा निधी रोखल्याचे सांगितले. तसेच आदिवासी उपयोजनेचा निधी प्रामुख्याने तीन बाबींवर खर्च करावयाचा असून, त्यात आदिवासी गावांमधील रस्ते, ग्रामपंचायत भवन यासह अन्य पायाभूत सुविधा, समाज सुधारण्यासाठी तसेच महिलांचे आरोग्य व समाजजीवन उंचविण्यासाठी हा निधी प्रामुख्याने खर्च करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी राज्यात सर्वाधिक पेसाची गावे नाशिक जिल्'ात असून, आदिवासी उपयोजनांतर्गत अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. आश्रमशाळांमधील भोजनाची व्यवस्था सुधारण्याबरोबरच एकूणच सोयी-सुविधा वाढविण्याबरोबरच इगतपुरी तालुक्यात सामूहिक स्वरूपात मात्र वैयक्तिक जबाबदारी असलेल्या पाणी उपसा जलसिंचन योजना राबविण्याकडे भर असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्'ासाठी ७७१ कोटींची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ४६५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)