शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइन; पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातल कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे ...

नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातल कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले असून, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू नाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून, दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यापूर्वी ऑनलाइन शिक्षण शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी होईल एवढा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. त्यामुळे पालकांना एकीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता आहे, तर दुसरीकडे तयारी पूर्ण झालेली नसताना आपला पाल्य परीक्षा कशी देणार, अशी चिंता पालकांना सतावते आहे. त्यामुळे अनेक पालक आतापर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत असून, परीक्षा केंद्र वाढविण्यासाठीही पालक आग्रही आहेत.

पॉइंटर-

दहावीची परीक्षा - २९ एप्रिल ते २० मे

विद्यार्थी - ९८,९४०

बारावीची परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे

विद्यार्थी - ६७,९१८

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते

कोट-१

दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाने कपात केलेला अभ्यासक्रम कोणता हेही अद्याप विद्यार्थ्यांना माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी पूर्ण कशी होणार. त्यामुळे शिक्षण विभागाने कपात केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती सार्वजनिक करण्याची गरज आहे.

-राजेश पवार, पालक

कोट-२

कोरोनाच्या संकटात शिक्षण विभााकडून परीक्षेची तयारी केली जात आहे. गेल्या वर्षात महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. त्या पद्धतीने दहावीच्या परीक्षेचे नियोजन करणयाविषयी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ऑनलाइन परीक्षा घेणे गरजेचे आहे.

-मुकुंद जोशी,पालक

कोट-३

अभ्यासक्रमात कपात केल्यानंतर परीक्षेत सामाविष्ट अभ्यासक्रम काय असणार आहे, याविषयी किमान विद्यार्थ्यांना माहिती दिली गेली पाहिजे, त्यानुसार विद्यार्थी परीक्षेची तयारी करू शकतील. विद्यार्थी समुपदेशानासाठी शाळांमधून तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

-गायत्री पाटील, पालक

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते

कोट -१

कोरोनाचे संकट असले तरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणेही आवश्यक आहे. त्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करतानाच शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रे वाढविण्यासंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र नाही, अशा शाळांनाही परीक्षा घेण्याची परवानगी देतानाच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

-समाधान आडके, पालक

कोट -२

विद्यार्थ्यांची परीक्षेची जागा सर्व पेपरसाठी एकाच वर्गखोलीत आणि एकाच बाकावर येईल यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन करावे, त्याचप्रमाणे परीक्षेचा कालावधी वाढला तरी चालेल; परंतु एकाच वेळी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

-विकास जाधव, पालक

कोट -३

कोरोनाचा प्रभाव वाढला, तर शिक्षण विभागाने ऑनलाइन परीक्षेची तयारी ठेवायला हवी, विद्यार्थ्यांना संकटाच्या परिस्थितीत परीक्षेला पाठविताना पालकच खंबीर नसतील, तर ते मुलांचे मनोधैर्य कसे वाढविणार. त्यामुळे परीक्षा सुरक्षित वातावरणात होतील याविषयी आश्वस्त केल्यानंतरच ऑफलाइन परीक्षा घेण्यात याव्यात.

-रंजना गायकवाड, पालक