शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइन; पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातल कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे ...

नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातल कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले असून, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू नाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून, दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यापूर्वी ऑनलाइन शिक्षण शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी होईल एवढा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. त्यामुळे पालकांना एकीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता आहे, तर दुसरीकडे तयारी पूर्ण झालेली नसताना आपला पाल्य परीक्षा कशी देणार, अशी चिंता पालकांना सतावते आहे. त्यामुळे अनेक पालक आतापर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत असून, परीक्षा केंद्र वाढविण्यासाठीही पालक आग्रही आहेत.

पॉइंटर-

दहावीची परीक्षा - २९ एप्रिल ते २० मे

विद्यार्थी - ९८,९४०

बारावीची परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे

विद्यार्थी - ६७,९१८

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते

कोट-१

दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाने कपात केलेला अभ्यासक्रम कोणता हेही अद्याप विद्यार्थ्यांना माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी पूर्ण कशी होणार. त्यामुळे शिक्षण विभागाने कपात केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती सार्वजनिक करण्याची गरज आहे.

-राजेश पवार, पालक

कोट-२

कोरोनाच्या संकटात शिक्षण विभााकडून परीक्षेची तयारी केली जात आहे. गेल्या वर्षात महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. त्या पद्धतीने दहावीच्या परीक्षेचे नियोजन करणयाविषयी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ऑनलाइन परीक्षा घेणे गरजेचे आहे.

-मुकुंद जोशी,पालक

कोट-३

अभ्यासक्रमात कपात केल्यानंतर परीक्षेत सामाविष्ट अभ्यासक्रम काय असणार आहे, याविषयी किमान विद्यार्थ्यांना माहिती दिली गेली पाहिजे, त्यानुसार विद्यार्थी परीक्षेची तयारी करू शकतील. विद्यार्थी समुपदेशानासाठी शाळांमधून तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

-गायत्री पाटील, पालक

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते

कोट -१

कोरोनाचे संकट असले तरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणेही आवश्यक आहे. त्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करतानाच शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रे वाढविण्यासंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र नाही, अशा शाळांनाही परीक्षा घेण्याची परवानगी देतानाच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

-समाधान आडके, पालक

कोट -२

विद्यार्थ्यांची परीक्षेची जागा सर्व पेपरसाठी एकाच वर्गखोलीत आणि एकाच बाकावर येईल यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन करावे, त्याचप्रमाणे परीक्षेचा कालावधी वाढला तरी चालेल; परंतु एकाच वेळी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

-विकास जाधव, पालक

कोट -३

कोरोनाचा प्रभाव वाढला, तर शिक्षण विभागाने ऑनलाइन परीक्षेची तयारी ठेवायला हवी, विद्यार्थ्यांना संकटाच्या परिस्थितीत परीक्षेला पाठविताना पालकच खंबीर नसतील, तर ते मुलांचे मनोधैर्य कसे वाढविणार. त्यामुळे परीक्षा सुरक्षित वातावरणात होतील याविषयी आश्वस्त केल्यानंतरच ऑफलाइन परीक्षा घेण्यात याव्यात.

-रंजना गायकवाड, पालक