शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नाशिक जिल्ह्यात ७५ दिवसांत १०६६ कोरोनाबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रहार बसू लागल्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत मोठी भर पडत असून, वाढत्या ...

नाशिक : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रहार बसू लागल्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत मोठी भर पडत असून, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेशा उपचार सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे; शिवाय रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या ७५ दिवसात एक लाख ६५ हजार २२६ बाधित रुग्ण वाढले असून, १०६६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात बळींची संख्या अधिक वेगाने वाढत असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची भयानकता काळजाचा थरकाप उडवत आहे. रोज ४०हून अधिक बळी कोरोनामुळे जात आहेत. त्यातच आरोग्य सुविधा अपुऱ्या ठरू लागल्याने वेळेत उपचार न मिळून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाबाधितांचा वेग मंदावला होता. जिल्ह्यात ७५ दिवसांपूर्वी ६ फेब्रुवारीला बाधितांचा आकडा अवघा १११ नोंदवला गेला होता. त्यात नाशिक महानगरात ७०, तर ग्रामीण भागात ३९ रुग्ण सापडले होते. त्यानंतर हा आकडा २०० ते २५०च्या दरम्यान राहिला. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बाधितांचा वेग वाढण्यास सुरुवात झाली. त्यापाठोपाठ बळींचीही संख्या धडकी भरवणारी ठरली. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २०५६ होती. आता ७५ दिवसांनंतर हा आकडा ३१२२वर जाऊन पाेहोचला आहे. बाधित रुग्णांची संख्याही एक लाख ६५ हजार २२६ने वाढून ती आता दोन लाख ८१ हजार ८७७ वर गेली आहे.

इन्फो

६ फेब्रुवारी २०२१ची स्थिती

एकूण रुग्ण - १,१६,६५१

एकूण बळी - २०५६

नाशिक ग्रामीण - ८०८

नाशिक मनपा - १०१९

मालेगाव मनपा - १७६

जिल्हाबाहेरील - ५३

इन्फो

२२ एप्रिल २०२१ची स्थिती

एकूण रुग्ण - २,८१,८७७

एकूण बळी - ३१२२

नाशिक ग्रामीण - १३६७

नाशिक मनपा- १४२८

मालेगाव मनपा- २३३

जिल्हाबाहेरील- ९४

-----------------------------

इन्फो

रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट

जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ८१ हजार ८७७ बाधित रुग्णांपैकी दोन लाख ३४ हजार ८६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी ७५ दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.२४ टक्के इतकी होती. आता कोरोनाबाधितांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे बरे होण्याच्या टक्केवारीचेही प्रमाण घसरले आहे. ते प्रमाण २२ एप्रिल रोजी ८३.०५ टक्क्यांवर आले असून, १४.१९ टक्क्यांनी घट झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाची याबाबतही चिंता वाढल्या आहेत. पुरेशा आरोग्य सुविधा पुरवण्याचे भले मोठे आव्हान प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.