शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुरामुळे हानी झालेल्या रस्त्यांसाठी १०० कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 01:45 IST

मान्सूनच्या हंगामात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणेवर परिणाम झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्ते व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाची कार्यवाही : पूर हानीसाठी निधीची मागणी

नाशिक : मान्सूनच्या हंगामात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणेवर परिणाम झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्ते व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांचीही पावसामुळे दैना झाल्याने त्याबाबतची माहिती तत्काळ गोळा करून शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या तोक्ते वादळाच्या तडाख्यात काही भागांला पावसाने झोडपले, त्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली. अनेक रस्त्यांची खडी उखडून जागाजागी पाणी साचले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने अनेक तालुक्यांना झोडपून काढले. विशेष करून येवला, नांदगाव, मालेगाव या तालुक्यात अतिवृष्टी होऊन नद्या, नाल्यांना पूर आला. पुराचा तडाखा इतका मोठा होता की, पाणी धोक्याची पातळी ओलांडून रस्त्यावर आल्याने काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले. काही पुल, मोऱ्या पाण्याखाली गेल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. रस्त्याची खडी वाहून गेल्याने ते ओबडधोबड झाले, तर काही ठिकाणी कालवे व बंधारे फुटून माती वाहून गेली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणारे जिल्हा मार्गांची मोठे नुकसान झाल्याने शासनाने अशा रस्त्यांची माहिती मागविली असता, सार्वजनिक बांधकाम खात्याने या ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली हानी प्रत्यक्ष शाखा अभियंत्यांना पाहणी करून अहवाल मागविला. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी जवळपास शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. या संदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता राजेंद्र सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. शासनाकडून निधी प्राप्त होताच, या रस्त्यांचे कामे पुर हानी पुनर्वसन योजनेंतर्गत तत्काळ हाती घेण्यात येणार असल्याचेही सोनवणे म्हणाले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ताब्यातीलदेखील रस्त्यांची पावसाळ्याच्या हंगामात दुरवस्था झाली असून, त्या संदर्भात विविध लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या बांधकामच्या तिन्ही विभागांना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी हानीग्रस्त रस्त्यांची माहिती गोळा करून तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्याची तयारी चालविली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदroad transportरस्ते वाहतूक