शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे हानी झालेल्या रस्त्यांसाठी १०० कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 01:45 IST

मान्सूनच्या हंगामात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणेवर परिणाम झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्ते व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाची कार्यवाही : पूर हानीसाठी निधीची मागणी

नाशिक : मान्सूनच्या हंगामात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणेवर परिणाम झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्ते व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांचीही पावसामुळे दैना झाल्याने त्याबाबतची माहिती तत्काळ गोळा करून शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या तोक्ते वादळाच्या तडाख्यात काही भागांला पावसाने झोडपले, त्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली. अनेक रस्त्यांची खडी उखडून जागाजागी पाणी साचले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने अनेक तालुक्यांना झोडपून काढले. विशेष करून येवला, नांदगाव, मालेगाव या तालुक्यात अतिवृष्टी होऊन नद्या, नाल्यांना पूर आला. पुराचा तडाखा इतका मोठा होता की, पाणी धोक्याची पातळी ओलांडून रस्त्यावर आल्याने काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले. काही पुल, मोऱ्या पाण्याखाली गेल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. रस्त्याची खडी वाहून गेल्याने ते ओबडधोबड झाले, तर काही ठिकाणी कालवे व बंधारे फुटून माती वाहून गेली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणारे जिल्हा मार्गांची मोठे नुकसान झाल्याने शासनाने अशा रस्त्यांची माहिती मागविली असता, सार्वजनिक बांधकाम खात्याने या ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली हानी प्रत्यक्ष शाखा अभियंत्यांना पाहणी करून अहवाल मागविला. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी जवळपास शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. या संदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता राजेंद्र सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. शासनाकडून निधी प्राप्त होताच, या रस्त्यांचे कामे पुर हानी पुनर्वसन योजनेंतर्गत तत्काळ हाती घेण्यात येणार असल्याचेही सोनवणे म्हणाले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ताब्यातीलदेखील रस्त्यांची पावसाळ्याच्या हंगामात दुरवस्था झाली असून, त्या संदर्भात विविध लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या बांधकामच्या तिन्ही विभागांना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी हानीग्रस्त रस्त्यांची माहिती गोळा करून तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्याची तयारी चालविली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदroad transportरस्ते वाहतूक