शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

येवल्याजवळ क्रूझरचे टायर फुटून १० जणांचा मृत्यू; साखरपुड्याहून परतताना काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:16 IST

येवला : कोळपेवाडी येथे साखरपुडा आटोपून धुळे येथे परतत असताना क्रूझरचे टायर फुटून ती मारुती ओम्नी व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार झाले असून, पंधराहून अधिक लोक जखमी आहेत. येवला-मनमाड रस्त्यावर बाभूळगाव शिवारात रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात झाला. याचवेळी पल्सर मोटारसायकल एसटीवर आदळून अन्य एक अपघात ...

येवला : कोळपेवाडी येथे साखरपुडा आटोपून धुळे येथे परतत असताना क्रूझरचे टायर फुटून ती मारुती ओम्नी व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार झाले असून, पंधराहून अधिक लोक जखमी आहेत. येवला-मनमाड रस्त्यावर बाभूळगाव शिवारात रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात झाला. याचवेळी पल्सर मोटारसायकल एसटीवर आदळून अन्य एक अपघात झाल्याने एकाच ठिकाणी चार वाहनांचा अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमींची संख्या अधिक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.या चार वाहनांच्या अपघातस्थळाचे दृश्य भयानक होते. अपघातस्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता. तसेच मृतांचे अवयव सर्वत्र विखुरले होते. एसटी बसचे किरकोळ नुकसान झाले. क्रूझर तसेच ओम्नी गाडीतील मृतदेह अखेर दरवाजा तोडून बाहेर काढले. वाहतूकदेखील सुमारे तासभर ठप्प झाली होती. दरम्यान, निजधाम व सावरगाव परिसरातील पवारांच्या गोतावळ्याने केलेल्या मदतीमुळे केवळ २० मिनिटात मदत कार्य करीतअपघात ग्रस्तांना दवाखान्यात उपचारासाठी पाठवले. अपघातातील जखमींची संख्या जास्त असल्याने खाजगी डॉक्टर किशोर पहिलवान, डॉ. संजय जाधव, डॉ भूषण शिनकर, डॉ कुलकर्णी यांनी ग्रामीण उपजिल्हा रु ग्णालयामध्ये येऊन शासकीय वैद्यकीय अधिकाºयांना उपचारासाठी मदत केली. भारती राव, (धुळे), पियुष तिवारी, दिपा तिवारी, शिनू तिवारी रा. इटावा, उत्तरप्रदेश, लोटन चित्ते (धरणगाव जि.जळगाव), पवन जाधव (दोंडाईचा) या जखमींना येवला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह टीमने जखमींना मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली.पोलीस उपाधीक्षक डॉ राहुल खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.अपघातातील मृतांची नावेआदित्य बबन मरसाळे (१२), रा. फाशीपूल, अण्णा भाऊ साठेनगर , धुळे, यश महेश राव (१०) रा. सुरत ,(गुजरात), महेश दिलीप राव (४२), रा. फाशीपूल, अण्णा भाऊ साठेनगर, धुळे, ओम्नी चालक संजय हरी सोनवणे (३२) रा. अयोध्यानगर, मनमाड, निशांत मनोज तिवारी,(२३), रिटा अतुल तिवारी, (२६), शुभा तिवारी, लक्ष्मीकांत दीक्षित सर्व रा. इटावा, जि. बाकेनार, अन्य दोन मृतांची नावे समजू शकली नाही.अपघातातील गंभीर जखमीभारती महेश राव (सुरत), गुड्डी मरसाळे (जळगाव), स्वप्नील बाविस्कर (धुळे), योगेश रवींद्र मरसाळे (धुळे), भूषण संजय गांगुर्डे (धुळे), इंदूबाई चित्ते (धरणगाव, जळगाव), लताबाई प्रकाश गांगुर्डे (धुळे), वंश राजू गांगुर्डे (धुळे), मोहित राजू गांगुर्डे (धुळे), ज्योती राजू गांगुर्डे (धुळे), आदी मरसाळे (धुळे), पिंटू राव (सुरत), विजय प्रकाश गांगुर्डे (धुळे) आदी.क्रूझर गाडीतील अपघातग्रस्त धुळे भागातील असून, ते कोळेपेवाडी येथून साखरपुड्याचा कार्यक्र म आटोपून धुळे येथे घरी परतत होते. क्रूझरमध्ये १५ ते १६ जण प्रवास करीत होते. ज्याचा साखरपुडा होता तो नवरामुलगा विजय गांगुर्डे रा. धुळे हा गाडीमध्ये जागा नसल्याने मित्राबरोबर मागून मोटारसायकलवर येत होता. त्यामुळे तो या अपघातातून बचावला.