शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नववी,अकरावीचे १ लाख ७९ हजार विद्यार्थी विनापरीक्षा पास ‌

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:13 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातील विविध माध्यमिक ...

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी केलेली मागणी व कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शिक्षण विभागाने नववी व अकरावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नववीच्या १ लाख ११ हजार ४२१ व अकरावीच्या ६८ हजार १६० विद्यार्थ्यांसह सुमारे १ लाख ७९ हजार ५८७ विद्यार्थी विनापरीक्षा पास झाले आहेत. यात ९५ हजार ४३१ मुले तर ९० हजार १५० मुलींचा समावेश आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या. पहिली ते आठवीचे सुमारे ९ लाख ६० लाख ५७४ विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. त्याप्रमाणे आता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच पावल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

इन्फो-

विद्यार्थी खूश, पालक चिंतेत

शिक्षक संघटनांकडून होणारी मागणी आणि कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी खूश झाले असले तरी पालकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. कोरोनामुळे मागच्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या, आता सलग दुसऱ्या वर्षी हीच परिस्थिती ओढवल्याने पालक चिंतेत असून कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण होऊ शकते तर ऑनलाईन परीक्षा का नाही, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोट-

ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांनी काय ज्ञानार्जन केले आहे, हे तपासण्यासाठी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय आहे, परंतु शिक्षण विभागाने याविषयी कोणताही विचार न करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात काही गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला नसल्याने शाळांंमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू होते. अशा शाळांमध्ये योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून परीक्षा घेणे आवश्यक आहे, परंतु सलग दुसऱ्या वर्षातही परीक्षा होणार नसतील तर विद्यार्थ्यांना परीक्षांचे गांभीर्यच उरणार नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने पुनर्विचार करून ऑनलाईन परीक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.

- समाधान गायकर, पालक

पॉईंटर

नववी- १,११,४२१

मुले -५९८२४

मुली-५१५९७

--

अकरावी- ६८१६०

मुले -३५६०७

मुली -३२५५३

एकूण १ लाख ७९ हजार ५८७