शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नववी,अकरावीचे १ लाख ७९ हजार विद्यार्थी विनापरीक्षा पास ‌

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:13 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातील विविध माध्यमिक ...

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी केलेली मागणी व कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शिक्षण विभागाने नववी व अकरावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नववीच्या १ लाख ११ हजार ४२१ व अकरावीच्या ६८ हजार १६० विद्यार्थ्यांसह सुमारे १ लाख ७९ हजार ५८७ विद्यार्थी विनापरीक्षा पास झाले आहेत. यात ९५ हजार ४३१ मुले तर ९० हजार १५० मुलींचा समावेश आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या. पहिली ते आठवीचे सुमारे ९ लाख ६० लाख ५७४ विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. त्याप्रमाणे आता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच पावल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

इन्फो-

विद्यार्थी खूश, पालक चिंतेत

शिक्षक संघटनांकडून होणारी मागणी आणि कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी खूश झाले असले तरी पालकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. कोरोनामुळे मागच्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या, आता सलग दुसऱ्या वर्षी हीच परिस्थिती ओढवल्याने पालक चिंतेत असून कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण होऊ शकते तर ऑनलाईन परीक्षा का नाही, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोट-

ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांनी काय ज्ञानार्जन केले आहे, हे तपासण्यासाठी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय आहे, परंतु शिक्षण विभागाने याविषयी कोणताही विचार न करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात काही गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला नसल्याने शाळांंमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू होते. अशा शाळांमध्ये योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून परीक्षा घेणे आवश्यक आहे, परंतु सलग दुसऱ्या वर्षातही परीक्षा होणार नसतील तर विद्यार्थ्यांना परीक्षांचे गांभीर्यच उरणार नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने पुनर्विचार करून ऑनलाईन परीक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.

- समाधान गायकर, पालक

पॉईंटर

नववी- १,११,४२१

मुले -५९८२४

मुली-५१५९७

--

अकरावी- ६८१६०

मुले -३५६०७

मुली -३२५५३

एकूण १ लाख ७९ हजार ५८७