शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शिक्षकांच्या विनंती बदल्यांनाही जि.प.चा ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्यांनाही आता खो मिळाला आहे. कोरोनाचे कारण देत या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्यांनाही आता खो मिळाला आहे. कोरोनाचे कारण देत या बदल्या रद्द करण्यात येत असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले आहे. दरम्यान, राज्यात सर्वत्र बदल्या होत असतांना केवळ नंदुरबार जिल्हा परिषदेनेच का रद्द केल्या आहेत? यामुळे दुर्गम भागातील महिला शिक्षकांवर अन्याय होणार असल्याचे राज्य प्राथमिक परिषदेने म्हटले आहे.कोरोनामुळे यंदा शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर १५ टक्के आॅफलाईन बदल्या करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यातही पुन्हा सुधारीत आदेश काढून आॅफलाईन बदल्या केवळ विनंती बदल्या कराव्या, प्रशासकीय बदल्या करू नये असे स्पष्ट करण्यात आले. नंदुरबार जिल्हा परिषदेने मात्र आता आॅफलाईन विनंती बदल्या देखील रद्द करण्याचे पत्र राज्य शासनाला देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोविड च्या पार्श्वभुमीवर शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे बंधन ाहे. इतर क्षेत्रीय कर्मचारी, नागरिक यांना कार्यालयात येण्यास निर्बंध असल्याने अशा परिस्थितीत आॅफलाईन पद्धतीने विहित मुदतीत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मणुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे आॅफलाईन बदली प्रक्रिया राबवितांना बदलीसाठी उपस्थित मणुष्यबळाची आवश्यकता असेल. मणुष्यबळ, बदलीपात्र शिक्षकांची उपस्थिती, त्यांना बसविण्यात येणाºया अडचणी राहणार आहेत.शिवाय विशेष संवर्ग १ मधील पात्र शिक्षक व ५३ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त गंभीर आजारी शिक्षकांचा समावेश असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समुपदेशन प्रक्रियेत सामाजिक अंतर पाळणे व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या स्थगित करण्यात येत असल्याचे या पत्रात सीईओ विनय गौडा यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे महाराष्टÑ शिक्षक परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा नंदुरबारपेक्षा जास्त प्रादुर्भाव असेल्या जिल्ह्यात प्रक्रिया राबविली जात आहे. वास्तविक जिल्ह्यात विनंती बदली मागणारे केवळ ६० ते ७० जण आहेत. त्यात दुर्गम भागातील विस्थापीत महिला शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना याअंतर्गत न्याय मिळाला असता. आता वर्षभर त्यांना पुन्हा दुर्गम भागात राहावे लागणार आहे. शिक्षणाधिकारी यांनी अनास्था दाखविल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही नाईलाज झाल्याचे शिक्षक परिषदेने म्हटले आहे.